काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, September 23, 2017

 पुगलिया- वडेट्टीवार गटात  हाणामारी

पुगलिया- वडेट्टीवार गटात हाणामारी



प्रतिनिधी/चंद्रपूर : नेहमी वादाच्या भोव-यात राहणा-या चंद्रपूर जिल्ह्यात कॉंग्रेसने आज कमालच केली. कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी निवडणुकीसाठी आलेल्या पक्ष निरिक्षकासमोर पुगलिया- वडेट्टीवार गटाचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले. त्यात हाणामारी करीत सभागृहाची काचेदेखील फोडण्यात आली. शनिवारी दुपारी हेल्थ क्लब समोरील इंटकच्या कार्यालयात घडली. जिल्हा कार्यकरणीची निवड लोकशाही मार्गाने करा, अशी पुगलिया गटाची मागणी होती. तर आमदार वडेट्टीवार यांनी निरीक्षकाला आपल्या गटाच्या बैठकीत नेल्याने पुगलिया समर्थक संतापले. तिथे जावून प्रचंड गोंधळ करीत नारेबाजी केली.


त्या 27 तरुणांना नोटीसा

त्या 27 तरुणांना नोटीसा


त्या 27 तरुणांना नोटीसा
मुंबई प्रतिनिधी:
मुंबईच्या सायबर पोलीस ठाण्यात फेसबुकवर देव गायकवाड या नावाने आक्षेपार्ह लिखाण एका तरुणाविरुद्ध विनयभंग, बनावट अकाऊंट उघडून फसवणूक आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याचबरोबर अधिक चौकशीसाठी त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या तरूणांना सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा पाठविल्या आहेत.

फेसबुकवर वादग्रस्त लिखाण करणाऱ्या  २७ तरूणांना मुंबई सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शासनाच्या शेतकरी विरोधी व इतर चुकीच्या धोरणांवर टीका करण्यात आल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्याचा आरोप नोटीसा मिळालेल्या तरूणांनी केला आहे. पोलिसांनी पाठविलेल्या या नोटीसा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे स्पष्ट करून सोशल मीडियावर याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आहे.

Friday, September 22, 2017

 वेकोलीच्या कर्मचाऱ्यांची गळफास घेउन आत्महत्या

वेकोलीच्या कर्मचाऱ्यांची गळफास घेउन आत्महत्या



प्रतिनिधी/ चंद्रपूर  स्वत:च्याच राहत्या घरी गळफास घेउन एका 28 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना पटाणपुरा वार्डात घडली . निखील अडगूलवार असे मृतकाचे नाव आहे. सदर युवक हा युवक वेकोलीत कार्यरत होता. आत्महतेचे कारण अद्यापही  कळू शकले नाही.

निखील हा दररोज प्रमाणे कामावर जाण्यासाठी सकाळी उठला नसल्याने त्याच्या घरच्यांनी त्याच्या खोलीचा दरवजा खटखटवला मात्र बराच वेळ हाऊन सुद्धा त्याने दरवाजा उघड़ला नाही. त्यामुळें त्याच्या घरच्यांनी खिडकीतून डोकाऊन बघितले असता सदर घटणा उघडकीस आली. या घटणेची माहीती तात्काळ शहर पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटणास्थळ गाठून शव ताब्यात घेत शवविच्छेदन प्रक्रिये करीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले असून त्याने आत्महत्या का केली या दिशेने तपास सुरु केला
विजेच्या धक्याने 17 वर्षीय युवकाचा मृत्यु

विजेच्या धक्याने 17 वर्षीय युवकाचा मृत्यु



चंद्रपूर प्रतिनिधी:
सार्वजणीक शारदा देवीच्या मंडपात झोपण्याकरीता गेलेल्या 17 वर्षीय युवकाला टेबल फॅनचा जबर शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत झाल्याची दूर्देवी घटणा गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घग्घुस येथे घडली असून सर्वेश होकम असे सदर युवकाचे नाव आहे. तो चंद्रपुर येथील सरदार पटेल महाविदयालयातील 11 वीचा विदयार्थी होता. सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवाची धुम सुरु आहें. नवरात्र निमीत्य जिल्हात शारदा आणि दुर्गा मातेची 10 दिवसांकरीता प्रतिस्थापणा करण्यात आली आहे. घूग्घूस येथेही सार्वजणीक मंडळात देखील शारदा देवी विराजमान झाली आहे. येथील मंडळातील सदस्यांने देखील काल मातेची प्रतिस्थापणा केली रात्रीची पुजा करुन सर्व सदस्य व पदाधिकारी आपआपल्या घरी गेले मात्र सर्वेश हा मंडळातच झोपणार होता. रात्री 12.30 वाजताच्या सुमारास त्याने मंडळात खाली गादी टाकली व झोपण्याची सोय केली. या दरम्याण तिथे असलेल्या टेबल फॅनच्या हवेने देवीच्या घटाचा दिवा विजेल यासाठी तो टेबल फॅंन बंद करण्याकरीता गेला मात्र यातच त्याचा जबर शॉक लागला व त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. या घटणेनंतर परिसरात शोककाळा पसरलेली आहे.
मिनी मंत्रालयाला लागली आग

मिनी मंत्रालयाला लागली आग

ब्रेकिंग न्यूज़..

चंद्रपूर प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या माळ्यावर असलेल्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कक्षाला आज रात्री 9.30 च्या सुमारास अचानक आग लागण्याने खळबळ उडाली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळाली नाही, मात्र या आगीत जिल्ह्याभरातील शैक्षणिक दस्तावेज जळून खाक झाल्याची भिती वर्तविण्यात येत आहे.घटनास्थळी विझविण्याचे काम सुरु असून रामनगर पोलिस तपास करीत आहेत.
गळफास लाऊन आत्महत्या

गळफास लाऊन आत्महत्या


चंद्रपूर (प्रतिनिधी) - घरात कोणी नसताना गळफास घेउन नवव्या वर्गात शिकत असलेल्या अनुराग शिल याने आत्महत्या केली.
अनुराग हा भिवापूर वार्डातील प्रांतिक बंगाली कॉलनी येथील रहिवासी होता. तो न्यु इंग्लिश हॉयस्कुल येथे नवव्या वर्गात शिकत होता. काल त्याचे वडिल बाहेरगावी गेले होते. तर आई बाजूच्या घरी गेली होती. त्याची बहिण शाळेत गेली होती.  घरी तो एकटाच होता. दरम्याण त्याची बहिण सायंकाळी पाच वाजता शाळेतून घरी परतली. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे घर शेजा-यांना आवाज दिला. यावेळी बराच वेळ दरवाजा खटकावला असता अनुरागने दरवाजा उघडला नाही.  अखेर दरवाजा तोडण्यात आला.  यावेळी घराच्या लाखडी फाट्याला मृतदेह लटकून होता. या घटनेची माहिती तात्काळ शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

Thursday, September 21, 2017

महाकाली दर्शन लाईव्ह

महाकाली दर्शन लाईव्ह

शक्तिरूप महाकाली मातेची महती मनी बाळगत यंदाच्या देवी नवरात्री निमित्त घटस्थापनेने पुरातन देवी महाकाली मंदिरात उत्सवाचा प्रारंभ झाला.


महाकाली मंदिरातुन दर्शन थेट तुमच्या मोबाईलवर ,बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://cdn.app3.ivb7.com/IVB7UserPortal?userid=347512



Wednesday, September 20, 2017

संजीवनीला हवी नवसंजीवनी

संजीवनीला हवी नवसंजीवनी


ललित सुनिल लांजेवार
चंद्रपूर - नाव संजीवनी उसरेटी. वय जेमतेम १६ वर्षे, दहावीला शिकतेय . घरची परिस्थिती अतिशय बेताची.  वडील एका खाजगी दुकानांत संगणक चालक, आई गृहिणी. जन्मापासून आजवर अतिशय आनंदाने  जगल्यानंतर अचानक एक दिवस तिच्या आयुष्यात एक वादळ आलं. त्यात ती आणि तिच्या घरचे चिंतेत गेले.
जुलै महिन्यातील अखेरचे दिवस. संजीवनी नेहमीप्रमाणे शाळेला जायची-यायची. यंदा तिचे दहावीचे वर्ष होते. ती अभ्यासात हुशार होती. एक दिवस अचानक तिची प्रकृती बिघडली. तिच्या पाठीवर व मांड्यावर खाज येत होती. सुरवातीला याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही.  मात्र त्रासही वाढत गेला. प्राथमिक उपचारासाठी तिला चंद्रपूर येथील प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ विनीत दुबे यांच्याकडे दाखल करण्यात आले. उपचारही सुरु झाला. बरेच दिवस उपचार सुरु असतानादेखील संजीवनीच्या शरीरावर कोणतीच औषध-उपचार काम करत नाही, असे निदर्शनात येत होते.
त्याच दरम्यान दोन्ही पाण्याच्या गूढघ्याला हिरव्या निळ्या रंगांच्या गाठी येऊ लागल्या होत्या. संजीवनीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात होती. आईवडील देखील दिवसेंदिवस चिंतेत पडत होते, घरची परिस्थिती देखील बेताची होती , एक हातावर कमविणे आणि दुसऱ्या हातावर खाणे,अशी परिस्थिती होती. यातच संजीवनीच्या वडिलांनी डॉ.  इंगळे नामक खाजगी डॉक्टरकडे या रोगाविषयी माहिती केली. त्यांनी त्यांना लगेच रक्त तपासणी करण्याचा सल्ला दिला. संजीवनीचे रक्ताचे नमुने घेण्यात आले, ते तपासण्यात आले. त्याचा रिपोर्ट आल्यावर संजीवनीच्या वडिलांना बोलवून काहीही न सांगता त्यांना नागपूर येथील हिमोटोलॉजिस्ट डॉ. रिया बल्लीकर यांना भेटावयास सांगितले.
आता इथून सुरु झाली होती संजीवनीला नवसंजीवनी देण्याची तिच्या घरच्यांची धडपड. संजीवनीचे वडील तिला घेऊन व्होकार्ड रुग्णालयात नागपूर येथे आले. तेव्हा तिची प्रकृती बघता तिला २ दिवस रुग्णालयातच भरती ठेवण्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी तिला "ब्लड कॅन्सर" झाल्याचे निष्पन्न केलं. हे सांगताच वडिलांना धक्काच बसला. आईदेखील वर डोळे करून बसली होती. इतक्या मोठ्या शहरात आणि इतक्या मोठ्या उपचारासाठी १५ लाख रुपयांची आवश्यकता भासणार होती. आईवडील दोघेही चिंतेत होते. आजवर जेही थोडं फार कमावलं होते, ते  वडिलांनी तिच्या प्राथमिक महागड्या उपचारासाठी खर्च केले होते. दोन दिवस रुग्णालयात भर्ती केल्यानंतर तिचे बोनम्यॅरो तपासणी करण्यात आली. त्यात तिच्या शरीरातले ब्लडसेल्स निष्क्रिय होत होते, असे सांगण्यात आले. ज्यामुळे तिची प्रकृती ही खालावत होती. त्यानंतर तिची प्रकृती पूर्णपणे सुधारण्यासाठी महागडी उपचार पद्धती कीमोथेरेपी सुरु होणार होती. या उपचार पद्धतीत कीमोथेरेपीचे इंजेक्शन अतिशय महागडे असतात, आता आणखी पैश्याची आवश्यकता भासणार होती. १ इंजेक्शन देऊन झाले होते आणखी तिला बरे होण्यासाठी २ इंजेक्शन घेण्याची आवश्यकता आहे.
तेव्हा इतके पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न संजीवनीच्या वडीलांना पडला. ही बाब चंद्रपूर येथील तिच्या परिसरात माहित झाली. अनेकांना तिच्या घरची परिस्थिती माहित असल्याने तिला आर्थिक मदत करण्याचे ठरविले. त्यात संजीवनी ज्या शाळेत शिकत होती त्या विद्या विहार शाळेतील शिक्षक, परिसरातील  नागरिक, तुकूम येथील तुकूम युवक गणेश व क्रीडा मंडळ यांनी गणपती उत्सवासाठी लागणारी मदत देखील संजीवनीच्या उपचारासाठी केली. संजीवनीचे नातेवाईक, शासकीय स्थरावर पाठपुरवठा करत मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी, चंद्रपूर येथील साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी देखील हजारो रुपयांची आर्थिक मदत केली.
मात्र ही सर्व मदत आजही संजीवनीच्या उपचारासाठी अपुरी पडत आहे. तिच्या वडिलांची मदतीसाठीची पायपीट ही सुरूच आहे. आज तिला इतरांसारखे सामान्य जीवन जगायचे आहे .


आणखी तिच्या उपचारासाठी जवळपास ७ लाख रुपयांची आवश्यकता आहे. तेव्हा तिच्या मदतीसाठी शहरभर अनेक पोस्टर्स लागले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र तुकूम शाखेच्या खाता क्रमांक- ६०२५८२६७०९९, IFSC -MAHB0000618 या खात्यात माणुसकीच्या नात्याने मदत करा
तुमची हीच मदत संजीवनीला नवसंजीवनी देण्यास उपयुक्त ठरू शकते .

Monday, September 18, 2017

कळत नकळत...

कळत नकळत...

जात्यात दगडी मनाच्या
बसलो विचार दळत...
विचारांचे ही पिठ झाले...
अगदी कळत नकळत

फुटली पालवी अक्षरांना
शब्दही आले पळत...
फुले रुचली त्या शब्दांना
अगदी कळत नकळत

पाहून सौंदर्य पथावरील त्या
नयनही होते चळत...
पथास मिळे आस त्या
अगदी कळत नकळत

शब्दच आले ध्यानीमनी
शब्दच होते कळत...
वाचले शब्द मनातले त्या
अगदी कळत नकळत

शब्दांची ती मंत्रआहोती
होमात शब्दच होते जळत
मुक्तीचे द्वार उघडले
अगदी कळत नकळत

शब्दच आज माझे धनी
मच्छिंद्रा चरणी वळत
तिच भक्ती तिच शक्ती
अगदी कळत नकळत
नवनाथ गाडेकर
__________________________
चांडोली बु" मंचर, पूणे
9922057525

Saturday, September 16, 2017

दिशा....

दिशा....

दिशा दिशा चुकली होती
आता चुकणार नाही...
देवा तुझ्या भक्तीला मी
आता मुकणार नाही...


फेरा होता तो दुर्दैवी
पुढे त्या झुकणार नाही
देवा तुझ्या भक्तीला मी
आता मुकणार नाही...

श्रद्धा भक्ती हे खतपाणी
पालवी सुकणार नाही...
देवा तुझ्या भक्तीला मी
आता मुकणार नाही...


मोडणे तू खोडले आई
दृष्टांना वाकणार नाही
देवा तुझ्या भक्तीला मी
आता मुकणार नाही...

देव माझा तू गुरुआई
आशिर्वाद  रुकणार नाही
देवा तुझ्या भक्तीला मी
आता मुकणार नाही...

नवनाथ गाडेकर
चांडोली बु ,ता आंबेगाव ( पुणे )
9922057525
महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांचे पडसाद

महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांचे पडसाद

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची विद्यार्थी संघटना भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एन.एस.यु.आय.) भारतीय जनता पक्ष व प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयं सेवक संघ (आर.एस.एस.) चा मजबूत सपोर्ट असणारी विद्यार्थी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थीपरिषद (ए.बी.व्ही.पी
.) कम्युनिष्ठाच्या विचारांवर चालणारी विद्यार्थी संघटना म्हणजे, ऑल इंडिया स्तूडेन्ट फेडरेशन (ए.आय.एस.एफ.) बिरसा आंबेडकर फुले स्टुडेन्ट आसोसिएशन (बाप्सा), आय.एस.ए. व राष्ट्रवादी काँग्रेसची विद्यार्थी संघटना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, शिवसेनेची विध्यार्थी सेना, मनसेची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, या सारख्या अनेक राजकीय पक्षांची पाठबळ असलेली विद्यार्थी संघटना व काही स्वतंत्र विद्यार्थी संघटना आहेत.
 महाराष्ट्र राज्यात मागच्या काही वर्षा पासून विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थी राजकारणावर बंदी आणली आहे ते का तर म्हणे विद्यार्थी निवडणुकाने विद्यापीठे व महाविद्यालयातील शिस्तभंग होतात व गुन्हे जास्त वाढताहेत. १९९४ पासून लोकशाही पद्धतीने होणाऱ्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती.
वयाच्या नवव्या दहाव्या वर्षापासून भारतीय लोकशाहीचे धडे घेणारा विद्यार्थी जर महाविद्यालयीन जीवनात भारतीय लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तर देशाला चांगले राज्यकर्ते तर मिळतीलच उलट देशाला चांगले मतदार सुद्धा मिळतील याच आपल्या महाराष्ट्राला विद्यार्थी व महाविद्यालयीन निवडणुकाने कित्येक असे चांगले राज्यकर्ते दिले आहेत ज्याचे उदाहरण आपल्याला माहित आहेत घ्यायचेच जर झाले तर महाराष्ट्राच्या जारकारणातील महामुनी असलेले शरद पवार, लोकनेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंढे आणि आताचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि भाजपचे आमदार व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या सारखे बरेचसे मोठमोठे राजकीय नेते महाराष्ट्र विद्यार्थी किंवा महाविद्यालयीन राजकारणाने महाराष्ट्राला दिले आहेत. हे सर्व सांगायचं कशामुळे तर येत्या शैक्षणिक वर्षपासून १९९४ पासून बंदी असलेल्या महाविद्यालयीन निवडणूक होणार आहेत. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायदा २०१६ मध्ये दोन्ही सभागृहाच्या सहमतीने हे विधेयक पारित करण्यात आले. या मध्ये प्रत्येक महाविद्यालयातून प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्यांकडून मतदान करून घेऊन विद्यार्थी सचिव निवडला जाईल त्यानंतर प्रत्येक महाविद्यालयातील सचिवांनी विद्यपीठ स्तरावर विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष व सचिव निवडण्यासाठी मतदान करतील यासोबतच आता विद्यापीठांच्या सिनेट मध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष व सचिव राहतील यामुळे सिनेट मध्ये जे सवाळा गोंधळ चालायचा त्यावर अंकुश लागेल.
विद्यार्थी परिषदांचे अध्यक्ष सचिव वगैरे १९९४ पासून निवडले जायचे पण ते थेट लोकशाही पद्धतीने न निवडता मेरिट बसे वर घ्यायचे यामध्ये ना नेतृत्व गुण पहायचे ना विद्यापीठ किंवा महाविद्यालयाच्या प्रशाष्णविरुद्ध एखादी विद्यार्थ्यांच्या हिताविरुद्ध होणाऱ्या कार्यवाहिला विरोध करायची क्षमता पाहिले जात होते. आशा या गोंधळामुळेच तर विद्यापीठांची व महाविद्यालयांची मनमानी सुरू झाली. कोणत्याही शैक्षणिक निर्णय घेताना विद्यार्थ्यांना बाजूला ठेवून निर्णय घेतले जात होते. यामुळेच तर फक्त बोटावर मोजण्याइतक्या विद्यापीठे व महाविद्यालये वगळता सर्वांचा शैक्षणिक दर्जा घसरला व जास्तीत जास्त बेरोजगार निर्माण झाले ते याच काळात. विद्यार्थ्यांकडून कितीही फीस आकारायचे, कोणतेही नियम लागू करायचे, याच काळात राजकीय लोकांनी अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केली व त्यांना पैसे छापण्याचे कारखाने करून टाकले, राजकीय नेत्यांना संस्थे मार्फत भरभरून पैसे भेटू लागले व महाराष्ट्र राज्याले याच नात्यांच्या संस्थे मार्फत असंख्य बेरोजगार. याचे जिवंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात चांगल्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठातील निकालांचा झालेला गोंधळ. जर विदयार्थी परिषदांचा विद्यार्थी हितसंबंधी कोणत्याही निर्णय घेताना सहभाग करून घेतला असता तर इतका गोंधळ झालाच नसता.
महाविद्यालयीन निवडणूका बंद होऊन महाराष्ट्राचा खूप मोठा न भरून निघणार राजकीय नुकसान झालं आहे. करण देशासह राज्यालाही महाविद्यालयीन निवडणुकांमधून दर्जेदार, दिमाखदार, प्रभावी, वैचारिक,सअमान्यांचे विचार करणारे, समयसूचकता असणारे, परिस्थितीची जण असणारे, आदर्श आचार विचार असणारे, लोकशाहीचा सन्मान करणारे, महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रामाणिक विकास करू इच्छिणारे, राष्ट्रय पातळीवरील राजकारणाला व्यवस्थित समून घेऊन राजकारण करणारे, पक्षाची भूमिका अचूक मांडून त्यानुसारच कार्य करणारे, राजकीय जीवनातील अनेक संकटाना सामोरे जाताना इतरांना त्रास होऊ न देणारे, लोकशाहीचे जाणकार आसे मातब्बर नेते महाराष्ट्राला दिले आहेत. हणूनच तर महाराष्ट्रात आजच्या घडीला व भविष्यात चांगल्या महाराष्ट्र ला साजेशे युवा नेत्रत्वाचे दुष्काळ आहे. आताचे जे युवा नेतृत्व फक्त काही ठिकाणी वगळता राजकीय कुटुंबाच्या वरसदरकांडे, म्हणजे मोठ्या राजकीय नेत्यांच्या मुलाकडे, मुलीकडे, कुठे पुतण्याकडे तर कुठे छोट्या भावाकडे तर कुठे नातेवाईकांकडे या मुळे मला तर चिंता वाटते की येत्या पंधरा ते वीस वर्ष्याच्या काळानंतर महाराष्ट्र राज्यातील नेते आता जे चालु विद्यमान आसलेली शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, बी आर अंतुले या सारख्या पहिल्या फळीनंतरची, नारायण राणे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, विखे पाटील यासारखे अनेक दुसऱ्या फळीतीळ राजकीय नेते संपल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे कसे होईल? महाराष्ट्राचे कसे होईल? येथील जनतेचे कसे होईल? खरच आपल्यासाठी दुर्दैवाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विकासगतील इतर राज्याच्या गतीसोबत ठेवणारे प्रभावी युवा व या विद्यमान सुजाण राजकीय मंडळी यानंतर भविष्याला चांगले नेतृत्वच नाही.
त्यावेळच्या काही जाणकार पण स्वार्थी राजकीय नेत्यांनि आपल्याला आपल्या संस्थेत मनमानी करता यावी आपल्यावर कोणी पाळत राहू नये म्हणून महाविद्यालयीन निवडणुकांवर वाढत्या गुन्ह्याच्या नावाखाली बंदि आणली करण त्यांना माहीत होतं की विद्यार्थी व महाविद्यालयीन निवडणुकामुळे चांगले विद्यार्थी नेतृत्व तयार होतात व नंतर तेच महाविद्यालयीन प्रशासनावर पळत ठेवतात करण ते स्वतःही तेच करून तिथपर्यंत पोहचले होते म्हणून स्वतःच्या शैक्षणिक संस्थेमध्ये आर्थिक फायद्यासाठी महाविद्यालयीन निवडणूका बंद केले होते. महाविद्यालयीन खुल्या लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांवर बंदी घालण्याचा दुसरा महत्वपूर्ण राजकीय कारण होता तो म्हणजे त्या काळातील राजकीय मंडळींनी तर त्यांची राजकीय पोळी भाजली होतीच पण त्यांना त्यांच्या दर्जाहीन, नेतृत्वाशून्य, अजाण राजकीय युवकांना म्हणजेच त्यांच्या मुलांना, मुलींना, पुतन्यांना,भावांना व इतर जवळच्या नातेवाईकांना अश्याच त्यांच्या तिसऱ्या फळीला राजकारणात आणायचे होते आणि तसेच झाले म्हणून तर १९९९ ते २०१४ या काळात महाराष्ट्राला लाभलेले डळमळीत युवा नेतृत्व साधारण कुटुंबातील असाधारण क्षमतेचे, अपार नेतृत्व कौशल्ये असलेले युवा नेते नसून राजकीय नेत्यांचेच ज्यांचे स्वताचेही मत नसलेली, एखाद्या हुशार व चतुर पत्रकारांच्या अवघड प्रश्नांची उत्तरे ही वडिलांना विचारणारे, फक्त वाढदिवसापूर्तीच ठराविक युवक गटांत चर्चेत राहणारे, ज्यांना त्यांच्या राजकीय कार्यात सक्रीय असलेल्या वडीलधाऱ्यांच्या मदतीशिवाय दहा ते वीस लोकांसमोर दहा ते वीस मिनिटे चांगल्या विषयावर नीट उभे राहून बोलताही येत नाही, फक्त घरची मंडळी राजकारणात आहे म्हणून मोठमोठे व्यवसाय करत त्याला जोड धंदा म्हणून राजकारण करणारे मुलं, मुली, पुतणे, भाऊ व इतर नातेवाईक असे नेते लाभलेले आहे हे अपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे कोणते राजकीय घराण्याशी संबंध असलेले राजकीय युवक युवती राजकीय जीवनात लोकांशी सांपार्क साधताना कोणाच्या नावाखाली मते मागतात व सहानुभूती चे राजकारण कसे करतात हे वेगळे सांगायची गरज नाही.
आता तळागाळातील प्रतिभावंत युवकांना राजकारणात प्रवेश करण्यासठी महाविद्यालयीन व विद्यपीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांमुळे सुवर्णसंधी मिळणार आहे तरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा पुरेपूर लाभ इतरांना काही ही त्रास न देता , लोकशाहीचा पूर्ण सन्मान करत, काही अनुचित प्रकार न घडू देता, आपल्या लोकशाहीतील सर्व अधिकार व जबाबदारीची जाणीव ठेवत, जास्तीत जास्त मतदान करून योग्य उमेदवारांना निवडून किंवा स्वतः प्रामाणिकपणे निवडणूक लढवून विद्यार्थ्यांच्या हितसंबंधी कार्य करत करतच मुख्य राजकारणाचे धडे घेत, आपल्या स्वतःच्या मतांनी राज्याला विकासकामत लागेल त्या काही मदत करता करता घ्यावा, दोन्ही संभागृहांचे महाविद्यालयीन निवडणुकांना काही नियम व अटी लावून हिरवा झेंडा दिल्याबद्दल आभार यामुळे आगामी काळातील महाराष्ट्राची राजकीय समीकरणे सध्याच्या राजकीय नेते मंडळींच्या डळमळीत ज्यांना शैक्षणिक प्रश्नांची, सामाजिक प्रश्नांची, आर्थिक विकासाची, महाराष्ट्रातील गरिबांची, शेतकऱ्यांची, शेतमजुरांची,वेठबिगाऱ्यांची, बेरोजगारांची तिळमात्र जाणीव नसलेल्या वरसदारांच्या हातात न राहता गोरगरीब सामान्य कुटुंबातील प्रतिभावंत युवा नेत्यांच्या हातात राहणार आहे यापेक्षा मोठा समाधान कशाने मिळणार आहे.
यामुळे या लोकशाहीच्या पर्वात सर्व युवकांनी यंत्रणेला काहीही गालबोट न लावता सहभाग नोंदवावा व डळमळीत होत चाललेल्या लोकशाहीला मजबूत करण्याच्या लाभलेल्या संधीचे सोने करतील अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही.

शिवाजी बळीराम जाधव
दावनगीरकर- ७५८८२१०१४३

Friday, September 15, 2017

नावाजलेल्या शाळा आणि पालक

नावाजलेल्या शाळा आणि पालक

एका शासकीय कार्यालयाच्या कँटीन मध्ये वर्ग तीन व चार दर्जाचे कर्मचारी दुपारचे जेवन झाल्यावर गप्पा मारत होते तितक्यात संतोष नावाच्या कर्मचाऱ्याने त्याच्याच सहकार्याला म्हणजे श्रीहरी ला विचारले की, "काय झालं हो तुमच्या मुलाला शाळेत टाकायचं होत टाकलं काय?" मग श्रीहरी ने आजूबाजूच्या कर्मचार्यकडे पाहून मन खाली करून लाजिरवण्या चेहऱ्याने म्हणाला, "काय सांगावे संतोष भाऊ मी आणि माझ्या मुलाची आई त्या शाळेत गेलो होतो पण तिथे फीसच खूप मागितली हो त्यामुळे मला माझ्या मुलाचा ऍडमिशन त्या महागड्या शाळेत करता आले नाही." कमाल आहे या देशातील पालकांची मुलाचं ऍडमिशन एखाद्या मोठ्या 'नावाजलेल्या' शाळेत केला नाही म्हणजे खूप मोठा गुन्हा केल्यासारखे वाटून घेतात. मग याच संभाषणात सुधीर बोलतो, "काय हो श्रीहरी मी तर माझ्या मोठ्या मुलाचं हि ऍडमिशन त्याच शाळेत केला होता आणि कालपरवा माझ्या लहान मुलाचहि ऍडमिशन त्याच शाळेत केलो आहे कारण ही शाळा आपल्या शहरातील सर्वात चांगल्या शाळेपैकी एक आहे. हि शाळा खूप मोठी आहे याच संस्थेची शेकडो शाळा शेकडो शहरात आहेत. आणि आपली मुलं इंटरनॅशनल दर्जाच्या शाळेत शिकवणे म्हणजे आपली मुले हमखास यशस्वी होतात, आणि तुम्ही म्हणताय कि फीस जास्त मागीतल्यामुळे ऍडमिशन केलं नाही, अहो तुमच्या पेक्षा तो बिचारा प्रधान चांगला नोकरीला लागून पाच वर्षेही झाली नाहीत पण त्याच्या मुलाला तो इंटरनॅशनल शाळेच्याच प्ले ग्रूप मध्ये टाकलाय, तुम्हाला तर नोकरीला लागून जवळ जवळ नऊ-दहा वर्षे झालीत तुम्ही तर तुमच्या मुलाचं ऍडमिशन नक्कीच ह्या शाळेत करायला पाहिजे कारण मुलांना इंग्रजी माध्यम मधून शिकविणे आजच्या काळाची गरज आहे."
आजच्या पालकांत एकच स्पर्धा लागली आहे की तो आपला सहकारी किंवा आपल्या पेक्षा कमी दर्जाची नोकरी करणारा इसम आपल्या मुला मुलींचे ऍडमिशन मोठ्या नेवाजलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत करत आहे तर मी का नाही? पण या स्पर्धे मध्ये त्यांचे लक्ष मुलांच्या प्रगतीकडे, शैक्षणिक विकासाकडे जातच नाही. आजकालच्या पालकांमध्ये तर एक खोट्या प्रतिष्ठेची लाट पसरलेली आहे की ज्यांचे मुलं मोठ्या नावाजलेल्या समूहातील किंवा इंटरनॅशनल शाळेत शिकतात तेच खूप प्रतिष्ठित. म्हणून मध्यमवर्गीय पालकांत आपापल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत मोठ्या शाळेत पाठवायची स्पर्धा लागली आहे आणि जे कोणी त्यांच्या मुलांचे ऍडमिशन शासकीय किंवा साधारण पण शैक्षणिक दर्जा जपणाऱ्या शाळेत कारेल तो आजच्या पालकांच्या दृष्टीने गौणच. असे गौण म्हणून घेण्यापेक्षा मुलाचं मोठ्या नावाजलेल्या शाळेत ऍडमिशन करतात व काहीही करून शाळेला मागेल तेवढी फीस देतात. पण यामध्ये मुलाच्या क्षमतेचा व सुप्त गुणाचे विचार कोणी करत नाही. मान्य आहे मला कि मुलांच्या विकासात शाळेचेही अनमोल वाटा असतो पण आजचे पालक मुलाच्या शाळेलाच मुलांच्या प्रगतीचे शंभर टक्के श्रेय देतात व कितीही प्रमाणाबाहेर फीस देऊन मुलांचे ऍडमिशन आशा नावाजलेल्या खोट्या प्रतिष्ठेच्या शाळेत करून सुटकेचा निश्वास सोडतात.
शाळेच्या दिवशी मूल शाळेत केवळ चार ते सहा तास असतो बाकी चे अठरा ते वीस तास तो पालक व मित्र परिवाराच्या सानिध्यात राहतो, मग मुलांना इतकी फीस देऊन मोठमोठ्या महागड्या शाळेत टाकायची स्पर्धा कशामुळे चालू असते हेच मला समजले नाही. एकदाची काय त्या शाळेची फीस भरली कि मग मुलाच्या विकासाची, प्रगतीची जबाबदारी त्या शाळेवर टाकून पालक मोकळे होतात पण मुलाच्या नैतिक मूल्यांचे काय? जे संस्कार घरात भेटायला पाहिजे ते शाळेत कशे भेटतील? आई वडील नोकरीला किंवा दोहोंपैकी एक नोकरीला घरी आले की आपापले मोबाइल घेऊन बसणार, टि व्ही चालू करून बसणार मुलांकडे लक्ष नाही देणार त्यांना काय शिकवलंय?, काय गृहपाठ दिलाय?, मुलांना काय हवंय?, त्यांचं मन त्या शाळेत लागतो काय?, आपण मुलांसाठी काही करू शकतो काय? त्याचे मित्र कसे आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला काय? मुल अभ्यासक्रमा वातिरिक्त इतर नैतिक मूल्यांची जोपासना करतो काय? मुलांना त्यांचे शिक्षक आवडतात काय? न आवडल्यास त्यांना कश्या शिक्षकांची आवड आहे? त्यांच्यात कोणकोणते सुप्तगुण आहेत? मुलांना काय करायला आवडते हे जाणून त्यानुसारच त्यांना करीअर करायला लावण्यासाठी आपण काही करू शकतो काय घरी अभ्यास करत नसेल तर शिक्षकांना भेटून त्यासाठी काही करू शकतो काय ते पाहावे, शिक्षकांना भेटून मुलांची प्रगती विचाली काय? विद्यार्थ्यांच्या वर्तनात आवश्यक बदल न झालास शिक्षकांना भेटून त्यावर काही उपायोजना आहे काय हे शोधून त्यानुसार कार्य करता येतील काय? या सारख्या अनेक बाबी आहेत जे कि पालकांनी लक्ष द्यायच्या आहेत जर या सर्व गोष्टी कडे जर पालकांनी लक्ष दिले नाही तर मूल इंटरनॅशनल तर काय जगातील सर्वोत्तम देशाच्या शाळेत जरी ठेवलं तर अपेक्षित प्रगती होणे शक्य नाही.
सध्या चर्चेचा विषय तो म्हणजे दिल्लीतील एका मोठ्या समूहाच्या शाळेतील सात वर्षाच्या मुलाच्या खुनाचा. आशा बेजबाबदार शाळेत मुलांचा प्रवेश करण्यासाठी पालकांत खूप मोठी स्पर्धा असते आणि एखाद्या वेळेस आशा लाजिरवण्या घटना घडल्यानंतर सागळ्यांचे डोळे उघडतात. मग एकेका बाबींची चाचपणी करतात वेगवेगळए खुलासे करतात. माध्यम वर्गीय पालकांचे सर्व आयुष्यच मुलांच्या शिक्षणात जातो ते जेवढे कमवतात जवळजवळ तेवढेच पैसे मुलांच्या शिक्षणात म्हणजे आशा मोठ्या व नावाजलेल्या शाळेची फीस देण्यात जातो. इतक्या चांगल्या शाळेत टाकूनही आई वडिलांनि नीट लक्ष दिल तर ठीक अन्यथा मुलं जातात वाया. वाया याचा अर्थ त्याला तर नोकरी पैसे वगैरे भेटेल पण जे आवश्यक मानवी मूल्ये आहेत तेच नसतील कारण मोठमोठ्या शाळेत केवळ आणि केवळ अभ्यासक्रमालाच महत्व दिला जातो तेही केवळ परिक्षे पुरताच त्यातील उद्दिष्टे पुर्तीला काहीच महत्व नसतो.
शिक्षण कोणत्याही माध्यमातून असो महत्व केवळ अपेक्षित वर्तन बदल व अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टे पुरतील महत्व द्यायला पाहिजे तरच मुलांचा सर्वांगीण विकास होईल त्या साठी कोणीही इंग्रजी माध्यमाच्या माघे न धावता मुलांना चेंगल्या दर्जेदार शाळेत पाठऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा मी म्हणत नाही की इंग्रजी ची गरज नाही इंग्रजी हि काळाची गरज आहे पण त्याला अवशक्यतेपेक्षा जास्त महत्व देऊ नये. सगळ्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळा दर्जाहीन असतात असे नाही काही शाळा खूप दर्जेदार हि असतात त्यांच्या शिक्षण प्रणाली ही खूप आदर्शवादी असतात. त्या शाळेमध्ये मुलाचे प्रवेश करायला काही हरकत नाही आणि आशा आदर्शवदी शाळांची फीस हि आवाक्यात असते. पालकांनि स्पर्धा लावावी आपल्या मुलांच्या शैक्षणिक विकासाची, मुलांकडून नैतिक मूल्यांची जोपासना करून घेण्याची दर्जेदार कौशल्यांची, खेळाची, संस्कृतीचं, कलेची, मानवतेची ना कि आपल्या पल्यानां अवढाव्या व अमाप फीस देऊन मोठ्या शाळेत प्रवेश मिळविण्याची.

शिवाजी बळीराम जाधव
दावनगीरकर - ७५८८२१०१४३

Thursday, September 14, 2017

परिस्थिती

परिस्थिती

कथा..........

- कल्याणी मुळे, नागपूर

नवरा दारू पिऊन सहा महिन्यापुर्वी वारला. तीन मुलांची जबाबदारी तीच्याच खांद्यावर येऊन पडली. ना कसलं शिक्षण ना कसलं कलाकौशल्य.ती आता धुण्या भांड्‌याची कामं करत असे. या पावसात लादी पुसताना तिचं पुर्ण अंग भरुन येई कारण आयुष्यभर नवर्याच्या हातून खाल्लेला मुका मार आता वर तोंड काढत होता. पण आता बादल्या भरभरून धुणं आणि बेसिन ओसंडून वाहणारी खरकटी भांडी घासल्याशिवाय काहीही पर्याय न्हवता. मुलं मोठी होत होती तशी त्यांची भुक पण मोठी झाली होती.

मागच्या महिन्यात लेकीच्या आजारपणात आगाऊ घेतलेली उचल आणि पगार संपून गेला होता. गेल्या दोन दिवसांपासून घरात खायला काहीही न्हवतंच. तसेही नेहमी पोटभर होतं असं नाही पण गेले दोन दिवस अक्षरशः काहिच न्हवतं.तिने गेले तीन दिवस पोटाला फडकं करकचून आवळून आणि मिसरीचा तोबरा भरून भुकेला चकवा दिला होता. पण आज सकाळीच कामाला निघताना धाकट्‌या लेकराने पायाला मिठी मारून " आई.... खायला " म्हटलं तेव्हा तिला गलबलून आलं होतं. ती तशीच कामावर पोहचली ....... ! कामं उरकली.
"बाई ..... थोडं काम होतं "
"हं बोल " बाईनी टिव्ही वरुन नजर न ढळवता म्हटलं
"जरा दोनशे रूपये पाहिजे होते " ती खालमानेनं म्हटली
आता बाईंनी टिव्ही वरील नजर हटवून हिच्याकडे पाहिलं तेव्हा त्या नजरेत राग काठोकाठ भरलेला होता.
"मागच्याच महिन्यात उचल दिली होती ना, पैसे काय झाडाला लागतात ?"
"नाय, पण घरात खायला काय सुदीक नाय ..... तवा जरा ....." ती पायाच्या बोटांनी फरशीला खड्डा पाडण्याचा प्रयत्न करत म्हटली
बाईंच्या तोंडावर बरेच शब्द आलेले पण डॉक्‍टरांनी दिलेला मनस्ताप टाळण्याचा सल्ला त्यांना आठवल्यामुळे त्यांनी स्वतःला आवरले
"हे बघ सतत पैसे मागायचे असतील तर तु नाही आलीस तरी चालेल , हे शंभर रूपये घे पण पुढच्या महिन्या शिवाय आता काही मागु नकोस'
किराण्याच्या दुकानात जाईपर्यंत ती शंभर रूपयाची नोट तीने कितीतरी वेळा उलटून पालटून पाहिली. दुकानदाराकडून मसाला ,तेल आणि तांदूळ घेतल्यावर अत्यंत अनिच्छेने त्याच्या हातात ती नोट दिली. सामानाची पिशवी छातीशी धरून ती लगबगीने घराकडं निघाली तेव्हा पावसाने देखिल जोर धरला होता.

"भडव्या तुला चार फोन केले तेव्हा एक उचलतोस. लोणावळ्याला वर्षा विहाराला जायचं हे मागच्या आठ दिवसांपूर्वी आपलं ठरलं होतं ना ?"
"अरे हो पण माझा बाप तुम्हाला माहिती आहे ना , गाडी साठी त्याचं मन वळवता वळवता नाकी नऊ आले तेव्हा कुठे आज गाडी मिळाली "
"चल जाऊ दे, घे एक सिप मार " त्याने बिअर पुढे केली
त्याने गाडीच्या एक्‍सिलेटर वर पाय देत बाटली हातात घेतली आणि ती थंडगार बियर घशात ओतायला सुरुवात केली. पेय उत्तेजक होतं. त्याला बरं वाटलं.त्याने ?क्‍सिलेटर वर आणखी जोरात पाय देत बाटली पुन्हा तोंडाला लावली.
" अरे , अरे समोर ती बाई बघ ...... अरे ब्रेक ब्रेक ..... " गाडीत एकच आवाज झाला
तोपर्यंत उशीर झाला होता . पिशवी घेऊन निघालेली ती बाई एका धक्क्‌यात बाजूला चिखलात जाऊन पडली होती.
" गाडी थांबवू नकोस , पळ, पळ चल पटकन " कुणीतरी ओरडत होतं.
त्याने एक्‍सिलेटर वर आणखी जोरात पाय देत गाडी तिथून सुसाट लोणावळ्याच्या दिशेने दामटली.

ती काही कळायच्या आत एका जोरदार धक्क्‌याने हवेत उडून पडली. "खूप वेदना" एवढीच तिला जाणीव होत होती. कुठलंतरी हाड मोडलेलं असावं. रस्त्यावरील लोक पळत आले होते त्यातील कुणीतरी तरी तिला उठवून बसवलं.
"कोण होते हरामखोर ?"
"हि बड्‌या बापाची मुलं ....... "
"चाबकाने फोडले पाहिजेत एकेकाला ..... "
लोकांचा गलका सुरू होता. पण तीला काहीही ऐकू येत न्हवतं कारण तीची नजर काहीतरी शोधत होती ....... आणि तिला ती दिसली .........
जवळच साठलेल्या काळ्याशार पाण्यात ती उलथी होऊन पडली होती. आतला तांदूळ त्या पाण्यात गडप झाला होता तर तेल त्या काळ्याशार पाण्यावर आपला तवंग उठवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होतं.
तीला ते सगळं समजायला काही क्षण जावे लागले आणि मग तीने एकच हंबरडा फोडला. पाऊस पुन्हा पडायला सुरुवात झाली होती.