সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 02, 2018

फरकंडा येथील शेतकऱ्याचा दोन हेक्टर ऊस जळून खाक

पंचनामा करून आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी
परभणी/प्रतिनिधी:

 पालम तालुक्यातील फरकंडा शिवारातील दि. 1 डिसेंबर रोजी 3:30 वाजता लाईटचा तार एकमेकाला घासून शॉट सर्किट होवून थिलंग्या पडल्या जवळपास दोन हेक्टर ऊस जळून खाक झाला 
सविस्तर व्रत - किशन नामदेव जोजाळ व चंद्रकांत पुरभाजी पौळ याची फरकंडा शिवरातील सर्वे न.169 यातील दोन शेतकऱ्यांचे ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.दुपारी शेतातील ऊसाला आग लागल्यामुळे आजु-बाजूच्या शेतकऱ्यांनी गावातील जेसीबी च्या साह्याने जळ्त आसलेला ऊसला लागलेली आग विझविली शेतातील ऊस साफ केला.
यात शेतकऱ्यांचे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले आहे. शेतातून  विजेचे पोल आहेत विज पुरवठा गावातून धानोऱ्याकडे लाईन गेली आहे.यामुळे शेतकऱ्याचे ऊसाचे नुकसान झाले आहे.तरी या जळालेल्या ऊसाचा लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी चंद्रकांत पौळ व किशन जोजाळ यांनी केली आहे अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे व भारनियमनामुळे या ऊसाला पाणी नाही उस वाळत आहे त्यामुळे कारखान्याने हा ऊस लवकरात लवकर घेऊन जाण्याची विनंतीही या भागातील शेतक-यानी केली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.