সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, July 02, 2018

सोशल मिडियावर चंद्रपूर पोलीसांची करडी नजर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 राज्यात मागील काही दिवसांपासून केवळ संशयावरून एखादी व्यक्ती अथवा गटावर जमावाने हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. लहान मुलांना पळवून त्यांच्याकडून भीक मागविली जाते किंवा त्यांच्या अवयवांची विक्री करणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पसरविण्यात येत आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका पोलिसांच्या संपर्कात रहा, असे आवाहन चंद्रपूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने या संदर्भात आज एक निवेदन जारी केले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, नजीकच्या पोलीस ठाण्यात चौकशी करावी, माहिती दयावी, असे आवाहन केले आहे.केवळ संशयावरून कायदा हातात घेणे आणि निष्पाप व्यक्तींचा छळ करणे हा गुन्हा आहे. राज्यात काही ठिकाणी संशयावरून हिंसक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारची कोणतीही घटना यापुढे घडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सर्तकतेचे निर्देश देण्यात आल्याचे पोलीस विभागातर्फे सांगितले. यावेळी त्यांनी नागरिकांनीही तथ्यहीन घटनांवर विश्वास ठेवू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करून येवून जनतेने अफवा पसरविणाऱ्यांबाबत सर्तक व संवेदनशिल राहावे व कोणताही अनुचित प्रकार समोर आल्यास त्वरित चंद्रपूर पोलीस कंट्रोल रूमलाला संपर्क साधावा अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच समाज माध्यमांवर, व्हाट्स ॲप, फेसबुक आदी माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 
चंद्रपूर जिल्हयातील सायबर सेल सोशल मेडियावर लक्ष ठेऊन असून अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.