काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, January 21, 2010

"विदर्भ बंद

"विदर्भ बंद

वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सर्वपक्षीय विदर्भ राज्य संग्राम समितीने काल (बुधवारी) पुकारलेल्या "विदर्भ बंद'ला चांगला प्रतिसाद मिळाला. विदर्भाच्या बहुतांशी भागांत बंदचे स्वरूप कडकडीत असे राहिले. जाळपोळ, दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता बंद शांततेत सुरू असल्याचे चित्र विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दिसून आले.

वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सर्वपक्षीय विदर्भ राज्य संग्राम समितीने काल (बुधवारी) पुकारलेल्या "विदर्भ बंद'ला चांगला प्रतिसाद मिळाला. विदर्भाच्या बहुतांशी भागांत बंदचे स्वरूप कडकडीत असे राहिले. जाळपोळ, दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता बंद शांततेत सुरू असल्याचे चित्र विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दिसून आले. चंद्रपूर शहरातील बाजार समिती, महात्मा फुले मार्केट, गंजवॉर्ड सब्जीमंडी आणि गोलबाजारात या बंदमुळे दिवसभर शुकशुकाट होता. राजुरा येथे शोभा मस्की या महिलेने सकाळी आठ वाजताच्या सुमारास टॉवरवर चढून लक्ष वेधले. त्यानंतर कोठारी आणि गोंडपिंपरी येथेही तरुणांनी टॉवर आंदोलन केले. नागभीड येथे नागपूर जाणारी नॅरोगेज रेल्वेगाडी थांबवून प्रवाशांना खाली उतरविण्यात आले, तर गडचिरोली-नागपूर मार्गावरील नागभीड जवळ रास्ता रोको करण्यात आला. भाजपचे खासदार हंसराज अहीर, कॉंग्रेस नेते माजी खासदार नरेश पुंगलिया यांनीही बंदमध्ये सहभाग दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही स्वतंत्र विदर्भाची मागणी केली.

Monday, January 04, 2010

Wednesday, December 30, 2009

चुभन तुम्हारी भी कम होगी...

चुभन तुम्हारी भी कम होगी...

Wednesday, December 30, 2009

सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - दु:खांचे डोंगर झेलणाऱ्या अपंग सुनील जोशी यांच्या आयुष्यातील तीळभर वेदना कमी करण्याचा प्रयत्न ब्रह्मपुरीतील एका दात्याने केला. हे करताना मात्र ते प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले. त्यामुळे या मदतीचे मोल वाढले आहे. "चुभन तुम्ही भी कुछ कम होगी... किसी के पाव का काटा निकालकर तो देखो' दुसऱ्यांचे दु:ख कमी करण्याच्या प्रयत्न केल्यास आपले दु:ख कमी होण्याचे समाधान मिळते, याची अनुभूती सध्या ते दानशूर व्यक्ती घेत असावे...

एकेकाळी भोजनालयात स्वादिष्ट भोजन देणारा संजय जोशी नशिबी आलेल्या अपंगत्वामुळे रस्त्यावरच आयुष्य जगतोय. काखेत दोन कुबड्यांचा आधार घेऊन भीक मागून जीवनाचे चक्र फिरविणाऱ्या सुनीलची व्यथा "सकाळ' चंद्रपूर टुडेच्या "रस्त्यावरच आयुष्य' या सदरातून 18 डिसेंबर 2009 च्या अंकात मांडण्यात आली. सुनील वामनराव जोशी 45 वर्षांचे आहे. अविवाहित. तरुणपणात कुटुंबाला आधार म्हणून तो जटपुरा गेट परिसरातील संजय भोजनालयात स्वयंपाकी म्हणून कामाला होता. त्याच्या शैलीने स्वादिष्टपूर्ण व चवदार पदार्थ तयार व्हायची. मात्र, नियतीने काही वेगळाच डाव खेळला. ग्राहकांच्या जिभेचे चव पुरविणाऱ्या त्या हातांना कुबड्यांचा आधार घ्यावा लागला. त्याच्या पायांना अपंगत्व आले. त्यामुळे रोजगार बुडाला आणि नशिबी भिक्षापात्र आले. आता वृद्ध वडील आणि आईसुद्धा जग सोडून गेली. हक्काचे घर नाही. जटपुरा गेटसमोरील वडाच्या झाडाखालीच तो राहतो.

ही व्यथा वाचून ब्रह्मपुरीच्या एका दानशूर कुटुंबाने मदतीचा हात दिला आहे. मात्र, आपले नाव "त्या' व्यक्तीला आणि कुणालाही माहीत करू नका, अशी विनंतीही या दात्यांनी केली. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात येणाऱ्यासाठी "दान' करणाऱ्यांच्या मांदियाळीत या व्यक्तीचे महत्त्व आणखी वाढले आहे. वर्तमानपत्रात संजयची व्यथा प्रकाशित होताच ब्रह्मपुरी येथील "त्या' अज्ञातदात्याने "सकाळ' कार्यालयाशी संपर्क साधला.

त्यानुसार, आनंदवन येथून तीनचाकी सायकल मागविण्यात आली. आज सायंकाळी जटपुरा गेटसमोरील वाहनांच्या वर्दळीतच सुनीलचा भावपूर्ण सत्कार करीत सायकल भेट देण्यात आली. एका अज्ञात कुटुंबाने दिलेली ही मदत आणि सायकल पोहोचविण्यासाठी विकलांग सेवा संस्थेचे श्रीराम पान्हेरकर, खुशाल ठलाल, बंडू धोत्रे यांनी सहकार्य केले. संबंधित बातम्या
स्वतंत्र विदर्भावरून युतीत तणाव नाही - खडसे
'काळ्या जादू'ची गडेगावात 'दहशत'
तीन सभापतिपदे कॉंग्रेसकडे
विदर्भात पावणे दोन लाख बालके पोषण आहारापासून वंचित?
घरपोच योजने'ची सुरवातच नाही?

प्रतिक्रिया

On 12/30/2009 9:45 AM qsuman said:
वन ईदियत ची प्रतिक्रिया वाचण्यासारखी आहे. भारतीय मनोवृत्तीचा नमुनाच. एखाद्याने मदत केली त्याचे कौतुक नाही. ती कशी कमीच आहे, आणखी काय करायला हवे या बद्धल सल्ला मात्र सर्व देतात. यातून स्फूर्ती घेऊन, इतरांनीहि पुढे येऊन मदतीचा हात देण्यास काय हरकत आहे? सल्ला देणार्यांनी स्वतः काही करायचा विचार केला आहे काय?

On 12/30/2009 7:45 AM बाजीप्रभू said:
अशी लोक खरच कमी आहेत.....

On 12/30/2009 1:10 AM One Idiot from Three ... said:
सायकल देऊन काय उपयोग ? जर छान जेवण करतो तर स्वयंपाकी म्हणून कुठे तरी नोकरी दिली पाहिजे, सायकल बरोबर

Sunday, December 13, 2009

वर्षभरात वाघांनी घेतले 40 बळी

वर्षभरात वाघांनी घेतले 40 बळी

चंद्रपूर - दरवर्षी वाघांच्या हल्ल्यात जिल्ह्यात 40 जण मृत्युमुखी पडतात, अशी माहिती खुद्द वनाधिकाऱ्यांनीच वनमंत्री पतंगराव कदम यांना दिली. त्यामुळे या प्रश्‍नाचे गांभीर्य या जिल्ह्यात किती आहे, हे कदम यांना समजले. मात्र, त्यांनी यावर भाष्य करणे टाळले.

वनमंत्री डॉ. पतंगराव कदम आज (ता. 12) जिल्ह्यात आले होते. त्यांनी येथील वनराजिक महाविद्यालयाच्या सभागृहात वनाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी वनविभागाचा आढावा घेतला. या बैठकीला विधानपरिषद सदस्य जैनुद्दीन जव्हेरी, राजुराचे आमदार सुभाष धोटे, प्रधान मुख्य वनसंरक्षक जोशी उपस्थित होते. डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक शस्त्रे देण्यात येत आहेत. तसेच त्यांना शस्त्र चालविण्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

वनविभागाचे बी. डी. एम. रद्द करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. स्पेशल ड्युटीपोस्टची पदेसुद्धा भरण्यात येत आहेत. रेंज पातळीवर वाहनेही लवकरच देण्यात येत आहेत. लाकडाची चोरी थांबविण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी वनसंरक्षक आर. एस. यादव यांनी चंद्रपूर उत्तर व दक्षिण विभागाच्या कामांची माहिती सादर केली. या विभागात साग, बीजा हे अतिमहत्त्वाचे लाकूड असून, यापासून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. ताडोबा अभयारण्यात 198 वाघ व बिबट्या आहेत. या वाघांच्या हल्ल्यांमुळे दरवर्षी 40 लोक मृत्युमुखी पडतात. मृतांच्या नातेवाइकांना दोन लक्ष रुपये देण्यात येतात, असे सांगितले. वनविकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एस. एच. पाटील यांनी वनविकास महामंडळाच्या विविध कामांची माहिती सादर केली. वनविकास महामंडळाला 10 कोटी रुपयांचा प्रकल्प मिळाला आहे. या विभागाला 24 कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत 12.89 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. या चर्चासत्राला मुख्य वनसंरक्षण वन्यजीव नंदकिशोर, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक एस. पी. ठाकरे, विभागीय वनाधिकारी अनिल मोहन, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप मनकवडे, वनविभागातील इतर अधिकारी रेंज फॉरेस्टर्स व इतर अधिकारी उपस्थित होते

Tuesday, December 08, 2009

Monday, December 07, 2009

...अन्‌ वेदना, भूक, तिरस्कार दूर झाला!

...अन्‌ वेदना, भूक, तिरस्कार दूर झाला!

...अन्‌ वेदना, भूक, तिरस्कार दूर झाला!

Friday, November 20, 2009
देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - घर बांधणे, विहिरी खोदणे, दगड फोडणे आदी कष्टाळू कामे करीत गाढवांच्या पाठीवरून भटकंती करीत पालावरचं जिणं सुरू होतं. दोन पुस्तक शिकल्यानंतर अव्यक्त भावनांना "बिराड"च्या रूपाने शब्दबद्ध करता आले. या शब्दांना महाराष्ट्राने दाद दिली. पण, खऱ्या अर्थाने "बिराड' स्थिरावले ते चंद्रपुरात. 23 जून 2003 तो दिवस आजही आठवतो. या दिवसापासूनच वेदना, तिरस्कार, दुःख, मनःस्ताप, चिरंतन भूक, अंधश्रद्धा यांचा शाप हळूहळू दूर व्हायला लागला, अशा भावना "बिराड'कार अशोक पवार यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या.

गेल्या सहा वर्षांपासून येथील रहिवासी झालेल्या पवार यांना उद्या (ता. 20) दिल्ली येथे "युवा संस्कृती राष्ट्रीय पुरस्कार' देऊन सन्मानित केले जाणार आहे. यानिमित्त भटकंती, पालावरचं जिणं आणि बॅंकेतील बचतगट असा प्रवास करणाऱ्या "बिराड'चा चंद्रपुरातील पहिल्या दिवसाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

23 जून 2003 चा दिवस. डोक्‍यावर उन्ह तापत होती. छातीत धकधक आणि धडधड करणाऱ्या रेल्वेने मी (अशोक पवार) चंद्रपूरला आलो. सोबत प्रकाश परांदे नावाचे मित्र होते. मळलेले कपडे आणि विखुरलेल्या केसांतून उष्णतेमुळे घामाच्या धारा वाहत होत्या. फाटक्‍या चप्पलमुळे रस्त्यावरची आग पायाला झोंबत होती. कुठेतरी रोजगार मिळेल, या आशेने वीटभट्टीवरील काम सोडून मित्र गजानन जानभोर यांच्या आग्रहाखातर इथे आलो होतो. बिराड वाचून जीवाभावाचा आणि मनापासून प्रेम करणारा मित्र भेटल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. फोनवरून नेहमीच बोलणे असायचे. चहापाणी घेतल्यानंतर त्यांनी सहकारी पत्रकार मित्रांची ओळख करून दिली. तिथे प्रमोद काकडे आणि नंदकिशोर परसावार नावाचे दोन मित्र भेटले. त्यांनीच जेवण आणि चप्पलची सोय करून पोट आणि पायाची आग विझविण्यास मदत केली.

अमरावती जिल्ह्यात वीटभट्टीवर काम करीत असताना कधी मातीमुळे कपडे भरायचे, तर भट्टीमुळे हात भाजायचे. या आगीतून बाहेर काढण्यासाठी जानभोर यांनी चंद्रपूरला बोलाविले होते. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत नेऊन अध्यक्ष बाबासाहेब वासाडे यांची भेट करून दिली. काहीतरी काम द्या, या विनंतीला बाबासाहेबांनी होकार दिला आणि आता नक्कीच बिराड स्थिरावेल, अशी आशा वाटली. लागलीच बॅंकेचे उपव्यवस्थापक रमेश लखमापुरे यांनी तोंडी मुलाखत घेतली. नव्यानेच सुरू झालेल्या बचतगट योजनेमध्ये महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्ती झाली. महिन्याला चार हजार रुपये मानधन ठरले. त्याच दिवशीपासून काम सुरू केले. पहिल्या दिवशी बचतगट म्हणजे काय, याची माहिती देणारी पत्रके वाचून काढली. ऑफीस, कर्मचारी हा प्रकार नवीनच वाटत होता. नोकरीचा पहिला दिवस अख्खा वर्षभरासारखा वाटू लागला. खुर्चीवर बसून टेबलवर पेनने कागदावर लिहिण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतला. सतत भटकंती आणि पालावरचं जिणं जगलेला बिराड खुर्चीवर बसल्याचे पाहून स्वत:लाच स्वप्नवत वाटत होते. चोर, बदमाश ठरलेला मी चंद्रपूरवासी झालो. अस्थिर जीवनाचा शाप घेऊन जन्मलेल्या बेलदार समाजातील माझ्यासारख्याला गाव मिळालं, घर मिळालं. दोनवेळच्या पोटाची सोयही झाली आणि आता सन्मानाने जगू लागलो आहे, असेही पवार यांनी मोठ्या आनंदाने सांगितले.
चंद्रपूरचा पारा 10 अंशाखाली

चंद्रपूरचा पारा 10 अंशाखाली

चंद्रपूरचा पारा 10 अंशाखाली
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, December 02, 2009 AT 11:30 PM (IST)
Tags: vidarbha, winter, cold

चंद्रपूर - उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कोसळत असताना अतिउष्ण चंद्रपूर शहराचाही पारा 10 अंशाखाली गेला आहे. पहाटेच्या वेळी कमाल तापमान 13, तर किमान 10 अंशावर आहे. पहाटेच्या वेळी धुके पडत असून, नागरिक गारठू लागले आहेत.

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भातील जिल्ह्यांत पारा घसरू लागला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून, पहाटेच्या वेळी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. यावर्षी ऑक्‍टोबर महिन्यात उष्णतेचा तडाखा बसला. ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या टप्प्यात तापमानात चांगलीच वाढ झाली होती. यावर्षी कमाल तापमानाचा उच्चांक याच महिन्यात गाठल्याने नागरिक हैराण झाले होते. ऑक्‍टोबर महिन्याचा प्रारंभ गरमा-गरम गेल्यानंतर दिवाळीचा जल्लोष जात नाही तोच गारव्याला सुरवात झाली आहे. मात्र, यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशाने जास्त होते. त्यामुळे पाहिजे तशी थंडी जाणवली नाही. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात घट होऊ लागली आहे. सध्या उत्तर भारतात किमान तापमानाचा पारा 12 ते 13 अंशाच्या आसपास घसरला आहे. उत्तर भारताकडून राज्याकडे येणारे वारे थंड असल्याने जिल्ह्यातील तापमान घटले आहे. या थंड वाऱ्याचे प्रमाण काही दिवसांत वाढण्याची शक्‍यता असल्याने थंडीचा कडाका वाढण्याची शक्‍यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होण्यास सुरवात झाल्याने दिवसाही थंडी पडू लागली आहे. हवामान खात्याच्या संकेतस्थळानुसार चंद्रपूर शहरातील सरासरी तापमान कमाल तापमान 28 अंश, तर कमीत कमी 10 अंश आहे. पहाटे दोन ते सकाळी आठ वाजेपर्यंत थंडी कायम असते. सूर्य उगवल्यानंतर सकाळी नऊ वाजतापासून थंडीचा जोर कमी व्हायला लागतो. रात्री आठ ते मध्यरात्रीपर्यंत तापमान 15 ते 17 अंशापर्यंत असते. त्यामुळे सूर्य अस्ताला गेला की, रात्रीच्यावेळी कपाटात ठेवलेले शाल, स्वेटर्स बाहेर निघू लागले आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात जोरदार थंडी पडेल. साधारणत: जानेवारीपर्यंत थंडी राहील, असा अंदाज आहे.