काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, February 08, 2019

विभागीय क्रीडा स्पर्धेत पांजराघाट अव्वल

विभागीय क्रीडा स्पर्धेत पांजराघाट अव्वल

नागपूर/अरूण कराळे 

नागपूर तालुक्यातील बाजारगाव केंद्रातील  जि.प.प्राथमिक शाळा ,पांजराघाट मधील विद्यार्थीनीनी  हिंगणा तालुक्यातील  आमगाव (देवळी ) येथे  झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेतील कनिष्ठ गट लंगडी खेळात अव्वल स्थान पटकाविले . विजयी चमुचे मुख्याध्यापक कृष्णा चावके, क्रीडाशिक्षक सुभाष कोल्हे, गटशिक्षणाधिकारी सुभाष जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी गोपाळ कुणघटकर, गुलाब उमाठे, रामराव मडावी ,छाया इंगोले, केंद्रप्रमुख शरद भांडारकर, दीपक तिडके, प्रकाश कोल्हे ,प्रवीण मेश्राम, सरपंच  तुषार चौधरी, उपसरपंच प्रकाश भोले, ग्रामपंचायत सदस्य झिंगूबाई टेकाम ,सुरेश कोल्हे ,शा.व्य.स. अध्यक्ष विठ्ठल येडमे तसेच सर्व  ग्रा.पं. सदस्य यांनी  अभिनंदन केले.  
रमाई आवास योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयाचे उद्दीष्ट आता 7000

रमाई आवास योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयाचे उद्दीष्ट आता 7000

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित
 चंद्रपूर, दि.8 फेब्रुवारी – राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री  तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचीत जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणा-या रमाई आवास घरकुल योजनेसाठी (ग्रामीण) चंद्रपूर जिल्हयाचे एकूण उद्दीष्ट आता 7 हजार इतके झाले आहे. यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळाच्या तुलनेत सदर योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयाच्या एकूण उद्दीष्टात या सरकारच्या काळात तिप्पट वाढ झाली आहे.
            शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागातर्फे 8फेब्रुवारी 2019 रोजी याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. सन 2018-19 या वर्षाकरीता चंद्रपूर जिल्हयासाठी सदर योजनेकरीता 4500 इतके मंजूर उद्दीष्ट होते. त्यात आता 2500 इतके अतिरीक्त उद्दीष्ट मंजूर करण्यात आले आहे. आता चंद्रपूर जिल्हयाचे एकूण उद्दीष्ट 7 हजार इतके झाले आहे.
            जानेवारी 2019 मध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत रमाई आवास घरकुल योजना (ग्रामीण) साठी लाभार्थ्यांची मागणी लक्षात घेता मंजूर उद्दीष्ट अपूरे पडत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यानुसार त्यांनी संबंधित विभागाला अतिरिक्त उद्दीष्ट मंजूर करण्यासाठी निर्देश दिले होते. त्यानुसार आता चंद्रपूर जिल्हयाच्या एकूण उद्दीष्टात 2500 ने वाढ झाली आहे.
            याआधी 2010-11 मध्ये 512, सन 2011-12 मध्ये 950, सन 2012-13 मध्ये 370, सन 2013-14 मध्ये 220, सन 2014-15मध्ये 1000 याप्रमाणे या सरकारच्या कार्यकाळात 3052 तर सन 2015-16 मध्ये 390, सन 2016-17 मध्ये1252,  सन 2017-18मध्ये 2000 तर सन 2018-19 मध्ये 7000 याप्रमाणे या सरकारच्या कार्यकाळात 10642 इतके उद्दीष्ट चंद्रपूर जिल्हयासाठी निर्धारित करण्यात आले आहे. यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळाच्या तुलनेत यासरकारच्या कार्यकाळात उद्दीष्टातील ही वाढ तिप्पट आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार आता सदर योजनेचे एकूण उद्दीष्ट 7000 इतके झाले आहे.
            अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण भागात रमाई आवास योजनेसाठी उद्दीष्टात झालेल्या भरीव वाढीमुळे मोठया संख्येने या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार आहे. 


चंद्रपुरात आजपासून पक्षिमित्रांचा चिवचिवाट

चंद्रपुरात आजपासून पक्षिमित्रांचा चिवचिवाट

19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपुरात*

पक्षीमित्र, पक्षी अभ्यासक, मार्गदर्शकांची मांदियाळी

चंद्रपूरः 19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन 9 व 10 फेब्रुवारी 2019 ला चंद्रपूरात आयोजित होत असून इको-प्रो संस्थेतर्फे सदर आयोजनाची तयारी पूर्ण झालेली आहे.


या संमेलनाचे उद्घाटक राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री नितिन काकोडकर यांचे हस्ते होत असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोपाल ठोसर, जेष्ठ पक्षी अभ्यासक असनार आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ जयंत वडतकर, अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षीमित्र, संमेलन अध्यक्ष श्री दिलीप विरखडे, विशेष उपस्थिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चे क्षेत्रसंचालक श्री एन आर प्रवीण, जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार, स्वागताध्यक्ष डॉ अशोक जीवतोड़े, श्री मनोहर पाऊनकर, अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, श्री सुरेश चोपणे, अध्यक्ष ग्रीन प्लैनेट प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.


सदर संमेलन मधे विदर्भातील पक्षीमित्र, अभ्यासक, मार्गदर्शक उपस्थित होणार असून या संमेलन मधे जवळपास 140 पक्षीमित्र यांनी नोंदणी केलेली आहे. सदर संमेलन जिल्ह्यातील माळढोक व सारस पक्षी संरक्षण व अधिवास संरक्षणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. दोन दिवसीय चालणाऱ्या या संमेलना मधे जिल्ह्यातील पक्षी अधिवास संरक्षण, विदर्भातील माळराने, पक्षी संरक्षण व संवर्धन, शहरी पक्षी अधिवास व सध्यस्थिति, पक्षी व पक्ष्याची अधिवास संरक्षण व संवर्धनापुढील आवाहने या विषयावर चर्चा सत्र आयोजित होणार आहे. या दरम्यान विविध अभ्यासकाचे प्रेजेंटेशन सादरिकरण होणार आहे.

अंधश्रद्धेचा समाजावर होणार परिणाम

अंधश्रद्धेचा समाजावर होणार परिणाम

अंधश्रद्धेचा समाजावर होणार परिणाम या विषयावर कारंजा येथील महाविद्यालाययात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती व राष्ट्रीय सेवा योजना रा.तू.म.नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवा जागृती अभियान 2018-2019 अंतर्गत अंधश्रद्धाचां समाजावर होणारा परिणाम या विषयावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कारंजा यांच्या आयोजनाखाली तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्ध्येचे आयोजन नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कारंजा येथे आयोजित करण्यात आला होता.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ पी.जे काळे सर उद्घाटक प्राचार्य अंधारे   हे तर प्रमुख पाहुणे अंनिस चे तालुका संघटक राजकुमार तिर्भाने , डॉ अमित याहूल .डॉ मेंढे ,बार्टी चे समतादूत विनायक भांगे, सिध्दार्थ सोमकुवर  हे उपस्थित होते

यावेळी स्पर्ध्येचे मुल्यांकनाची  जवाबदारी समतादूत सिध्दार्थ सोमकुवर व अंनिस सहसंघटक राणसिंग बावरी यांनी पार पाडली. या स्पर्ध्येत तालुक्यातील  साक्षी सावरकर,प्रज्वल शिरपूरकर,कांचन बसिने,कोमल खवशी,भावना बंनगरे या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला यात   प्रथम   वैभव ढोबळे, द्वितीय लोकेश सोनोने  व तृतीय कोमल खवसे यांनीं  प्राविण्य प्राप्त केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अंकित खांडवे,उद्देश वाल गावकार,प्रेरणा सावरकर,पूजा हिंगवे,प्रेमीला भांगे,वैभव ढोबळे अपेक्षा वरकडे, वैभव ठाकूर, रश्मी हिंगवे व निशा नासारे यांनी अथक परिश्रम घेतले.

 स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र सुरु करा

स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र सुरु करा

मनोज चिचघरे, भंडारा प्रतिनिधी 

पवनी : तालुक्यामध्ये रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी तालुका पवनी, यांनी केली. 


भंडारा जिल्ह्यातील बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस असल्यामुळे ८०,०४८ नोंदणीकृत बेरोजगार व अनोंदणीकृत लाखो बेरोजगार रोजगाराच्या शोधात ईतरस्त्र भटकत आहेत. 

अशोक लेलैन्ड, सनफ्लँग एम, एम, पी, (महाराष्ट्र मेटल पावडर) 

हिंदुस्तान कोमझेप, ई -लाईट या कंपन्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी तालुका, अध्यक्ष शुभम वंजारी, 

व लोमेश वैद्य, शैलेश मयूर, लोकेश वैद्य  प्रफुल्ल रघूते, शुभम देशमुख, अजय धेग्रे, यांनी केली. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. 


 पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत

पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

परभणी/ प्रतिनिधी :-

  केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली असून यामध्ये 5 एकर शेती असणाऱ्या कुटुंबातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य तीन टप्प्यामध्ये मिळणार आहे. तरी पात्र शेतकऱ्यांनी आधारकार्ड व बँक पासबुकाची छायांकीत प्रत संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक, सोसायटीचे सचिव, कृषी सहाय्यक गावात हजर राहतील त्यांच्याकडे शुक्रवार दि.8 फेब्रुवारी 2019 रोजी सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या कक्षामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्याबाबत दि.6 फेब्रुवारी रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा उपनिबंधक मंगेश  सुरवसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


ग्रामस्तरीय समितीमध्ये तलाठी हे समिती प्रमुख तर ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे सचिव हे सदस्य असणार आहेत. तरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.

 परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबीर

परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबीर

प्रशांत गेडाम/ प्रतिनिधी

 सिंदेवाही -:  तालुक्यातील सर्वोदय विद्यालय  गडबोरी येथे प्रथम  (NGO) आणि सिंदेवाही  पंचायत समिती  मधील शिक्षण विभाग  यांच्या  तर्फ़े   सिंदेवाही तालुक्यातील विद्यार्थ्यांची  परीक्षेबद्दल भीती दूर व्हावी,  परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा याकरिता तालुक्यातील गडबोरी ,वासेरा ,रामाळा देवाडा या गावातील    वर्ग 10 वीच्या   विद्यार्थ्यांना करीता परीक्षा पूर्व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या प्रतिमचे पुजन करून उद्घाटक करण्यात आले. यावेळी गणित आणि इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन तालुक्यातील तज्ञ मार्गदर्शन श्री मांडवकर सर , ठवकर सर आणि करंबे सर  विषय तज्ञ मेश्राम सर  प्रथम चे विनोद ठाकरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून बोर्ड परीक्षेच्या कृतीप्रतिका कश्याप्रकार चे असतात .हे  समजावून सांगण्यात आले. तसेच गडबोरी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले व  परीक्षेकरिता  विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .

या कार्यमाला पंचायत समिती सिंदेवाही विषय तज्ञ भारत मेश्राम सर आणि प्रथम चे प्रतिनिधी विनोद ठाकरे ,सपना कुलमेथे ,आरती नागदेवते ,  भूषण निशाणे यांनी सहकार्य केले यावेळी सर्वोदय शाळेचे मुख्याध्यापक  शिक्षक वर्ग आणी शाळेचे तसेच परीसरातील  विद्यार्थी उपस्थित होते.

मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा १९ फेब्रुवारीला

मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा १९ फेब्रुवारीला

श्रीक्षेत्र मुक्तापूर पेठ येथे समाज मेळावा व सामुहिक विवाह सोहळा
नागपूर/ अरूण कराळे :


श्री संत दौलत महाराज संगमेश्वर शिवमंदिर सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ (जलालखेडा) येथे दरवर्षी प्रमाणे माघ् पौर्णिमा उत्साहाच्या पावन पर्वावर सोमवार १८ फेब्रुवारी व मंगळवार  १९ फेब्रुवारी रोजी मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा, मातंग समाज मेळावा व सामाजिक सत्कार सोहळा संस्थेच्या वतीने व माजी राज्यमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने यांच्या प्रमुख  उपस्थितीत आयोजित केलेला आहे.
 श्री संत दौलत महाराज संगमेश्वर सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ (जलालखेडा, तालुका नरखेड) येथे आयोजित १८ फेब्रुवारी रोजी दुपारी संस्थान परिसरात ग्राम स्वच्छता अभियान  राबविण्यात येईल. तर सायंकाळी सहा वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सामुदायिक प्रार्थना होईल. नंतर रामभाऊ निमकर यांचे शहनाई वादन तर हरिनाम व सामाजिक किर्तन ह .भ.प. रामचंद्र महाराज काळबांडे यांचे होईल. गितगायन मुक्ताताई, श्रीराम जोंधळकर, भक्तीमय संगीत संजय तिळके, सुगम गायन पुजा किशोर वानखेडे, वंदना खंडारे अन्य समाजातील कलावंताचे प्रबोधन, गायन करण्यात येईल.


      १९ फेब्रुवारीला दुपारी १ ते २  मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा, समाज मेळावा व सामाजिक सत्कारमुर्तीचे स्वागत समारोहाचे औचित्य साधून अरुण गायकवाड यांच्या शहनाई वादनासह महाराष्ट्र शासन समाजभुषन पुरस्कृत संजय ठोसर,शंकर ठोसर प्रस्तुत स्वररंग म्युजिकल ग्रुप नागपूरच्या वतीने अभंगवाणीचे सादरीकरण मनवर ठोसरसह क्रिष्णा गायकवाड यांचे राहील. गोपालकाल्याचे किर्तन ह .भ .प .रामचंद्र काळबांडे, संगीतमय समाज प्रबोधन अशोक वानखेडे व संच  अंजनसिंग जि.अमरावती यांचे राहील.
     मातंग समाजातील इच्छुक वधु-वरांनी आपली नावे आयोजक समीतीच्या श्रीसंत दौलत महाराज संगमेश्वर सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ यांचेकडे  रविवार १० फेब्रुवारी  पर्यंत निःशुल्क नोंद नोंदविली जाईल. तसेच मातंग समाज बांधवानी या संधीचा लाभ घ्यावा. व जास्तीतजास्त संखने उपस्थित राहवे असे आवाहन श्रीसंत दौलत महाराज संगमेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बालकदास खंडारे, उपाध्यक्ष अशोक डोके, सचिव नत्थु अडागळे, सहसचिव रामदास खडसे, कोषाध्यक्ष अरुण गायकवाड, संपर्क सचिव संजय ठोसर यांनी केले आहे .
      संस्थान परिसर श्रीक्षेत्र मुक्तापूर पेठ या मंगलमय कार्यक्रमास लाभणारे सत्कारमुर्ती माजी राज्यमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने,माजी जि.प.सदस्य डॉ.आनंद खडसे, जि.प.उपाध्यक्ष शरद डोनेकर, जि .प. माजी अध्यक्ष बंडोपत उमरकर, जि.प.शिक्षण सभापती उकेश चव्हाण, पं.स. सभापती राजेंद्र हरणे, मुक्तापूर पेठ सरपंचा द्वारकाबाई नाखले, जेष्ठ समाजसेवक डॉ .अशोक कांबळे, लहानु इंगळे, महादेव जाधव, केशव कांबळे, रविंद्र खडसे, सुनिल सोनवाने, साहेबराव वानखेडेसह पदाधिकारी व सदस्यगण यांच्या उपस्थितीत मंगलमय विवाह सोहळा कार्यक्रम होणार आहे.


Thursday, February 07, 2019

शेतकऱ्यांच्या खात्यात 7200 कोटी रुपये जमा होणार

शेतकऱ्यांच्या खात्यात 7200 कोटी रुपये जमा होणार



प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा
महाराष्ट्रातील 80 टक्के शेतकऱ्यांना लाभ

मुंबई, दि. 7 : केंद्र शासनाने जाहिर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या 80 टक्के शेतकऱ्यांना मिळणार आहे. योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात 7 हजार 200 कोटी रुपये जमा होणार असून योजनेसाठी शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांनी सूचना दिल्या आहेत. अशी माहिती कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. 

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार ही योजना राज्यात राबविण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. गरजू शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

सन 2015-16 मध्ये झालेल्या कृषी गणनेनुसार राज्यात 1 कोटी 52 लाख 85 हजार 439 शेतकरी आहेत. कोकण विभागात 14 लाख 86 हजार 144 शेतकरी आहेत त्यापैकी अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी संख्या 84.50 टक्के एवढी आहे. नाशिक विभागात 26 लाख 94 हजार 481 शेतकरी असून त्यापैकी 78 टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. पुणे विभागात 37 लाख 23 हजार 673 पैकी 84 टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. औरंगाबाद विभागात 39 लाख 53 हजार 400 शेतकऱ्यांपैकी 79.50 टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. अमरावती विभागात एकूण शेतकऱ्यांची संख्या 19 लाख 13 हजार 258 असून 73 टक्के अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी असून नागपूर विभागातील 15 लाख 14 हजार 483 शेतकऱ्यांपैकी 76 टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक गटातील आहेत.

ज्या कुटुंबाचे (पती-पत्नी आणि त्यांच्या 18 वर्षाखालील अपत्यांचा समावेश) सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकुण कमाल धारणक्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल अशा कुटुंबाना प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबाचा देखील या योजनेत समावेश करण्याचा तसेच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी कृषी विभागाने नोडल विभाग म्हणून कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

संवैधानिक पद धारण करणारे/केलेले आजी व माजी व्यक्ती, आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य, आजी/माजी महानगरपालिकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारितील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी/कर्मचारी (चतुर्थश्रेणी/गड-ड वर्गातील कर्मचारी वगळून), मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती,निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता,सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊटंट), वास्तुशास्त्रज्ञ (आर्किटेक्ट), इ. क्षेत्रातील व्यक्ती यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अपात्रतेचे निकष केंद्र शासनाने निश्चित केले आहेत.

एखाद्या संयुक्त कुटुंबामध्ये चार किंवा पाच उपकुटुंब असतील आणि त्यातील प्रत्येकाच्या नावावर दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असेल तर त्या उपकुटुंब प्रमुखालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार असून ते दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यात देण्यात येतील.

राज्यात अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या 80 टक्के म्हणजे जवळपास एक कोटी 20 लाख एवढी असून त्यातील निकषास पात्र शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत वर्षभरात 7200 कोटी रुपये मिळणार आहेत. गरजू शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोण?

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोण?


▪माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अर्ज केलाच नाही

▪काँग्रेसकडून 12 जणानी केले अर्ज


चंद्रपूर/ प्रातिनिधी :
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोण?, असा प्रश्न चर्चेत आहे. यातच माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अर्ज केलाच नाही. त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून एकूण बारा जणांनी अर्ज केले. यावेळी या सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजपकडून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना परत उमेदवारीची शक्यता वर्तविली जात असताना काँग्रेसकडून मात्र इच्छुक दावेदारांची यादी वाढत आहे. पण कॉंग्रेसचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर जिल्यातील चंद्रपूर,बल्लारपूर, राजुरा व वरोरा या चार तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. हा मतदारसंघ कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र १९९६मध्ये या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात भाजपला यश आले. त्यानंतरच्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले. २००४ नंतर मात्र भाजपने आजतागायत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे. लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या लोकसभेच्या दृष्टीने राजकीय हालचालींनी वेग पकडला असला तरी अद्यापही कोणत्याच पक्षाकडून उमेदवारी स्पष्ट झालेली नाही.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात खरी लढत भाजप-काँग्रेसमध्येच होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चेला आता सुरुवात झालेली आहे. विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार हे लोकसभा लढण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत, तर दुसरीकडे ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मात्र आपला अर्ज भरलेला नाही. मागील वेळेस पुगलिया यांना डावलून संजय देवतळे यांना उमेदवारी देण्यात आली. पण त्यानंतर देवतळे भाजपवासी झाले. ते बघता आता नविन चेहऱ्याला संधी मिळण्याची  शक्यता आहे. यात तेली समाजातील नेते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. माजी खासदार दिवंगत नेते शांताराम पोटदुखे यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली होती. त्यांच्या निमित्ताने तेली समाजाला संधी मिळाली. या लोकसभा मतदारसंघात तेली समाज सर्वाधिक असून, त्यातील अनेक दावेदार निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यात प्रामुख्याने तेली समाजाचे वरिष्ठ नेते आणि सेवादलचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, देवराव घटे यांचा समावेश आहे. समाजा पाठोपाठ कुणबी समाजाचीही संख्या मोठी असल्याने या समाजातूनही इच्छुकांची यादी पुढे आली आहे. यात मनोहर पाउनकर, दिनेश चोखारे, बाळू गोहोकार यांचा समावेश आहे. याशिवाय प्राध्यापक कोंगरे, आमदार कासावार, सुनीता लोढीया, शिवा राव यांनीही उमेदवारी साठी अर्ज दाखल केला आहे.


चंद्रपूरची जागा सेवादलला राखीव 
केंद्रीय स्तरावर पक्ष नेतृत्त्वात मोठ्या प्रमाणात  झालेले बदल आणि आगामी लोकसभा बहुमताने जिंकण्यासाठी कांग्रेस रणनीती आखत आहे. त्यानुसार काँग्रेसच्या विविध विंगमधील लोकांना पुढे आणण्यासाठी योजना आखली जात आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील मागील १५ वर्षांचा इतिहास बघता यंदा चंद्रपूरची जागा सेवादल साठी राखीव ठेवण्याचा विचार पक्ष निरीक्षक करीत आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील काही जेष्ठ नेत्यांना २६ जानेवारी ला प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईला बोलाविले होते. त्यानंतर वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या सर्वांना ५ फेब्रुवारीला दिल्लीला बोलावून घेतले. चंद्रपूरच्या या जागेवर चर्चा करण्यासाठी सेवादल चे राष्ट्रीय संघटक लालजी देसाई यांनी हि जागा सेवादलच्याच एखाद्या कार्यकुशल कार्यकर्त्याला देण्याची आग्रही भूमिका मांडली. यावेळी नागपूर, वर्धा, भंडारा आणि चंद्रपूर येथील वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते.

शिवाणीचे ब्रह्मपुरीत दौरे वाढले 
चंद्रपूर लोकसभेची जागा मिळावी, यासाठी विजय वडेट्टीवार प्रयत्नशील असून, तसे झालेच तर वारसदार म्हणून ब्रह्मपुरी विधानसभेतून सुपुत्री शिवाणी वडेट्टीवार निवडणूक लढू शकते. त्यासाठीच ती गेल्या ८ दिवसापासून ब्रह्मपुरीत दौरे करीत आहे. सावलीतील मेहा बुज येथे महिला काँग्रेसचा मेळावा, आरोग्य मार्गदर्शन व हळदीकुंकु कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी विजय वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थिती होत्या. गेल्या काही दिवसापासून त्या सावली तालुक्याचा दौरा करीत आहेत.

नाहीतर हे येणार बाहेरील चेहेरे 
चंद्रपूर काँग्रेस कमेटीतील २ गटातील वाद जर निवडणूक काळापर्यंत शमला नाहीतर बाहेरील चेहेरे उभे करण्याचा प्रस्ताव सुरु आहे. यात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे किंवा माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांना तिकीट देण्याचा विचार पक्षातील काही नेते करीत आहेत.

पारोमिता विधानसभा लढणार
श्रमिक एल्गारच्या प्रमुख तथा दारूबंदीच्या प्रणेत्या पारोमिता गोस्वामी या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील,अशी चर्चा मागील काही दिवसापासून होती. शिवाय त्या कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात होते. मात्र त्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करित असल्याची चर्चा पुढे आली आहे. 
राष्ट्रपतींनी घेतली जुन्या पेन्शनच्या लढाईची दखल

राष्ट्रपतींनी घेतली जुन्या पेन्शनच्या लढाईची दखल



🔵 विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाच्या निवेदनाची दखल

🔵 जुनी पेन्शन व शिक्षण हितार्थ एकीने लढण्याचे मिलिंद वानखेडे यांचे आवाहन



नागपूर - देशभरात जुन्या पेन्शनच्या मागणीचा आवाज सर्वदूर घुमत आहे. हा आवाज विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरने थेट राष्ट्रपतीं पर्यंत पोहोचविला. राष्ट्रपतींनी या निवेदनाची दखल घेतली असून संबंधित कार्यालयांना यात लक्ष घालण्याचे कळविले असल्याचे पत्र संघटनेला पाठविले आहे.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपसी मतभेद विसरून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक नेते व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरचे संस्थापक मिलिंद वानखेडे यांनी केले आहे.

राज्य सरकारने एक नोव्हेंबर 2005 पासून लागलेल्या कर्मचार्‍यांना 1982-84 ची पेन्शन योजना बंद केली. त्याऐवजी खासगी कंपनीच्या धोरणावर अवलंबून असलेली फसवी नवीन अंशदाय पेंशन योजना (DCPS /NPS) लागू केली आहे. या योजनेत कर्मचार्‍यांचे कुठलेही संरक्षण नसल्याने मृत्यू पश्चात किंवा निवृत्ती नंतर कुटुंबाची वाताहत करणारी हि योजना आहे. राज्यात आजमितीस 3500 कुटुंबावर हा डोंगर कोसळला असून त्यातून गोंडस पेन्शन योजनेचे दुष्परिणाम दिसून येत आहे. राज्यात अत्यंत आक्रमक पध्दतीने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे मोठे आंदोलन सुरू आहे.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर तर्फे 27 सप्टेंबर 2018 रोजी थेट राष्ट्रपतींना 1700 पोस्टकार्ड व 80 पानाचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्फत पाठविण्यात आले होते. या आंदोलनाची राष्ट्रपतींनी दखल घेतली असून या विषयावर गांभीर्यपूर्वक निर्णय घेण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे पाठविले आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आजमितीस संपूर्ण देश एकवटला आहे. नवी दिल्ली येथे NMOPS च्या माध्यमातून अटेवा बंधू यांनी पाच लाख कर्मचार्‍यांच्या उपस्थित शंखनाद फुंकला आहे.

कर्मचारीवर्गाच्या हितार्थ जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे धाडस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखविले. मात्र राज्यातील राज्यकर्ते आताही केवळ अभ्यास करीत असल्याच्या थापा मारून कर्मचार्‍यांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे No Pension - No Vote चा बिगुल फुंकला असून जुन्या पेन्शनसाठी वेगवेगळ्या मंचावर लढाई लढणा-या सर्व शासकीय कर्मचारी संघटनेने एकजुटीनं जुनी पेन्शनचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर तर्फे माजी शिक्षण मंडळ सदस्य व शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांनी केले आहे.

राष्ट्रपतींना 1700 पोस्टकार्ड पाठविण्याच्या आंदोलनात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे राजेंद्र खंडाईत, खिमेश बढिये, गणेश खोब्रागडे, गणेश उघडे, रविकांत गेडाम, समीर काळे, भिमराव शिंदेमेश्राम, संजय धरममाळी, सुरेश धारणे, राजु हारगुडे, गोंदिया जिल्हा संघटक बालकृष्ण बालपांडे, प्रणाली रंगारी, रिना टाले, आत्माराम बावनकुळे, राजु भस्मे, गौरीशंकर साठवणे, अरविंद घोडमारे, आशा कास्त्री,सारिका पैडलवार यांच्यासह शिक्षक, वनविभाग, ग्रामसेवक, टपालसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
बळसाणेत शालेय गरजू विद्यार्थ्यांना गणवेश  वाटप

बळसाणेत शालेय गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

खबरबात, गणेश जैन, धुळे

बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे येथील कै.एन.पी.जी.विद्यालयात  हुशार , होतकरू व गरजू मुला, मुलींना नुकतेच ६५० शालेय गणवेश मोफत वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाल्याचे महावीर जैन यांनी सांगितले. 

शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची कला पण हीच कला काही दिवसांनी संपण्याच्या मार्गावर आहे  बळसाणेसह माळमाथा भागात शेतकऱ्यांची व सर्व साधारण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शिक्षण अर्धवट च राहून जात आहे व बळसाणेसह माळमाथा परिसरात बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून जैन समाजाने दुष्काळ ग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषाखा पासून ते स्कूल बँग्स , वह्या , कंपास , वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे गेल्या वर्षी बळसाणे विद्यालयात बावीशे रजिस्टर नोटबुक्स वाटपाचा कार्यक्रम मुंबई च्या प्रेम स्पर्श मार्फत झाला त्याच प्रमाणे महावीर जैन यांनी विश्वकल्याणकाचे ट्रस्ट गण यांना सांगितले की बळसाणे गावात दुष्काळ परिस्थिती असल्याने विद्यार्थी शालेय जीवनात लागणाऱ्या साहित्यास खरेदी करावयास मोठी अडचण भासत असल्याने असे विद्यार्थी शिक्षणापासून अलिप्त होताना दिसून येत आहे यासाठी आपण शालेय विद्यार्थ्यांना गणवेश भेट द्यावे अशी अपेक्षा महावीर जैन यांनी केली जैन यांच्या सांगण्याप्रमाणे धुळे येथील कमलेश गांधी यांनी मुंबई येथील दानशूर चंद्रहास वोरा यांना बळसाणे येथील विद्यार्थी पैसे अभावी शिक्षणाला तऱ्हे देत आहे तरी आपण आपल्या इच्छा शक्तीनुसार शालेय गणवेश देण्यात यावे त्याचप्रमाणे मुंबई चे चंद्रहस वोरा यांच्या वतीने कै. एन.पी.जी.विद्यालयाला साडे सहाशे विद्यार्थ्यांना गणवेश भेट देण्यात आले नियमितपणे समाजकार्यासाठी जैन समाज खरोखरच पुढे येत असल्याचे सरपंच दरबारसिंग गिरासे यांनी मनोगतातून सांगितले व कमलेश गांधी म्हणाले की आमच्या संस्था कायम सामाजिक उपक्रमास अग्रेसर राहत असल्याची ग्वाही गांधी यांनी दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र टाटीया होते याकामी विश्वकल्याणकाचे ट्रस्टचे संचालक विजय राठोड, कमलेश गांधी , सुरेंद्र टाटिया  , सुरेंद्र भंसाली , पत्रकार गणेश जैन ,चंदन टाटीया व महावीर जैन व प्रमुख पाहुणा म्हणून दरबारसिंग गिरासे यांच्या उपस्थितीत शालेय गणवेश मुप्त वाटप करण्यात आले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.बी.पटेल व आभार प्रा.एस.बी. मोहने यांनी केले तसेच

कार्यक्रम यशस्वीसाठी शाळेचे प्राचार्य , उपप्राचार्य यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले

NSS शिबिर म्हणजे आदर्श नागरिक घडविण्याचे केंद्र

NSS शिबिर म्हणजे आदर्श नागरिक घडविण्याचे केंद्र

www.khabarbat.com

www.khabarbat.com

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात  अनिल दबडे यांचे प्रतिपादन

मायणीः ता. खटाव जि. सातारा(सतीश डोंगरे)

  "राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे उद्याचे आदर्श नागरिक घडविण्याचे केंद्र आहे. या शिबिरांमधून प्रेरणा व बळ घेऊन समाजकार्य करणारे कार्यकर्ते घडतात. तरुणांना समाजकार्याची नवी दिशा मिळते, " असे प्रतिपादन  जयभवानी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल दबडे यांनी केले. ते कला, वाणिज्य महाविद्यालय च्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच श्री. भास्कर खरात हे होते. यावेळी पोलीस पाटील सचिन शेटे,  प्राचार्य डॉ सयाजीराव मोकाशी,श्री यशवंत माळी, श्री राजू रसाळ, श्री अलीभाई तांबोळी (स्वच्छता दूत), सत्यजीत साळुंखे, श्री दीपक नामदे, श्री विठ्ठल पाटील, नदीम शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते


कार्यक्रमाच्या प्रारंभी रासेयो प्रकल्पाधिकारी डॉ. उत्तम टेंबरे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी पोलीस पाटील सचिन शेटे यांनी ग्रामस्थांच्यावतीने संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. श्री विठ्ठल पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या जुन्या आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन प्रा. शिवशंकर माळी यांनी केले. ग्रामस्थ, प्राध्यापक वृंद याची मोठी उपस्थिती होती.