काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, August 12, 2010

श्रावण आला हं!

श्रावण आला हं!

पाऊस पडतो झिरीमिरी ओल्या झाल्यात कामिनी



भाकरीच्या पाट्या शेतात जातात घेऊनी


पाऊस पडतो पडतो थांबेना गं पागोळी


धरणीमाय हिरवी चोळी घालीतसे


पाऊस पडतो पडतो सये पडतो मुसळधार


गंगेला आला पूर दुही थडी "
ग्रामपंचायत निवडणुकांचा भार लिपिकांच्या खांद्यावर

ग्रामपंचायत निवडणुकांचा भार लिपिकांच्या खांद्यावर

अग्रोवन मुख्य पान


Thursday, August 12, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: agro, chandrapur, grampanchyat election
चंद्रपूर - नायब तहसीलदार, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकाऱ्यांसारखी 45 अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लिपिकांना निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडावी लागत आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्‍यांतील 651 ग्रामपंचायतींच्या निवडणुका तोंडावर असून, हा भार लिपिकांना पेलावा लागत आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पंचवार्षिक कालावधी पूर्ण होणाऱ्या 651 ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यांत होऊ घातल्या आहेत. पहिल्या (22 ऑगस्ट) व दुसऱ्या टप्प्यात (5 सप्टेंबर) अनुक्रमे 325 आणि 326 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल. या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आदी अधिकारी सांभाळतात; मात्र तब्बल 45 पदे रिक्त असल्याने मोठी गैरसोय होत आहे.
उपजिल्हाधिकारी जाधव यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी एम. एच. सोनगावकर यांची नियुक्ती करण्यात आली; मात्र ते अद्यापही रुजू झालेले नाहीत. त्यामुळे हे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. अतिक्रमण विभागाचे उपजिल्हाधिकारी बावणे यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी महिन्याभरापासून नवीन नियुक्ती करण्यात आली नाही. भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांची चार पदे रिक्त आहेत. येथेही एकाही अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. उपजिल्हाधिकारी पदाच्या सहा जागा रिक्त असल्याने कार्यालयीन कामकाज हाताखालच्या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. तहसीलदारांच्या सहा जागा रिक्त आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल, सामान्य प्रशासनातही रिक्त जागा आहेत. जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांचा कारभार प्रभारी तहसीलदारांच्या खांद्यावर आहे. नायब तहसीलदारांच्या सर्वाधिक 33 जागा रिक्त असल्याने ग्रामीण भागातील कामकाज खोळंबले आहे. मोठ्या तालुक्‍यात नायब तहसीलदारांच्या चार, तर छोट्या तालुक्‍यात तीन जागा मंजूर आहेत. ब्रह्मपुरी तालुका वगळता बहुतांश तालुक्‍यांत केवळ एक ते दोन नायब तहसीलदार कार्यरत आहेत. ब्रह्मपुरीत नायब तहसीलदारांची चार पदे मंजूर असून, ती भरण्यात आली आहेत. चंद्रपूरसारख्या जिल्ह्याच्या मुख्यालयी केवळ सात जागा मंजूर असून, त्यापैकी केवळ दोन पदे भरण्यात आली आहेत. मूल तालुक्‍यात चारपैकी दोन, सावलीत दोन, राजुरा, कोरपना, जिवती येथे तीन, गोंडपिंपरी एक, पोंभुर्णा दोन, बल्लारपूर दोन, सिंदेवाही तीन, नागभीड दोन, चिमूर, भद्रावती, वरोरा येथे प्रत्येकी दोन जागा रिक्त आहेत. या रिक्त पदांचा कार्यभार लिपिकवर्ग सांभाळत असून, निवडणुकीच्या कामाचा बोजा त्यांच्यावर आला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरणे सुरू आहे; मात्र लिपिकांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात न आल्याने अनेक चुका होण्याची भीती राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे.

http://www.agrowon.com/

Sunday, August 08, 2010

बोगस बिलांतून 25 लाखांचा गैरव्यवहार

बोगस बिलांतून 25 लाखांचा गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा

Friday, August 06, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: crime, bribe, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - कंत्राटी कर्मचाऱ्यांना अग्रीम रक्कम देता येत नसतानादेखील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी बोगस बिले जोडून सर्वशिक्षा अभियानातील 25 लाखांचा गैरव्यवहार केल्याची माहिती आहे. वर्षभर प्रभार सांभाळणाऱ्या या शिक्षणाधिकाऱ्यांची नुकतीच बदली झाल्यानंतर हा घोळ लक्षात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मागील दीड वर्ष कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी नव्हते. त्यामुळे उपशिक्षणाधिकारी पदावरील अधिकारीच ही खुर्ची सांभाळत होते. जिल्हा परिषदेच्या सभा किंवा मोठ्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान हे प्रभारी अधिकारी नेहमीच गायब राहायचे. त्यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात हजेरीपटावर आजारी रजा, दौरा, तातडीच्या कामाची नोंद आहे. सभांमध्ये उत्तर देणे जमत नसल्याने आणि आपला भोंगळ कारभार उघड होऊ नये म्हणून कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविणे, हा प्रकार त्यांच्या कार्यकाळात चालला. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची बदली नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या नव्या अधिकाऱ्याला मागील कार्यकाळात झालेला गैरव्यवहार लक्षात आला. मात्र, त्यांनी याची कुठे वाच्यता केलेली नाही. विश्‍वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटी कर्मचाऱ्यांना अग्रीम रक्कम देता येत नाही. याउपरही प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांनी एक ते दीड लाखांचे अग्रीम राशी वितरित केली. त्याची कुठेही नोंद नसून, बोगस बिले जोडण्यात आली आहेत. सर्वशिक्षा अभियानांतर्गत येणाऱ्या अपंग एकात्म शिक्षण, पर्यायी शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम आदींची बिलेही बोगस असल्याची माहिती आहे. सात ते 10 जूनपर्यंत पंचायतराज कमिटीकरिता शिक्षण विभागाची एक चमू पाठविण्यात आली. त्यासाठी त्यांनी खासगी बस भाड्याने केल्याचे दाखविले. यात 20 ते 25 हजारांचे बिले जोडण्यात आली आहेत. वस्तुत: बस भाड्याने करण्यात आलेली नव्हती. जर केली असेल तर डिझेल किंवा टोलटॅक्‍सच्या पावत्या जोडलेल्या नाहीत. शिवाय कंत्राटी साधनव्यक्तीच्या नियुक्ती आणि बदलीतही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती आहे.
सात लाखांच्या गुंतवणुकीत 15 लाखांची कमाई

सात लाखांच्या गुंतवणुकीत 15 लाखांची कमाई

सकाळ वृत्तसेवा
Friday, May 14, 2010 AT 12:15 AM (IST)

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - कुष्ठरोग्यांचे नंदनवन असलेल्या आनंदवनात श्रमाचे मोल शिकायला मिळते. ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांच्या स्वप्नातून साकारलेल्या या गावाची यशोगाथा जगापुढे आहे. त्याच आनंदवनात "आमच्या गावात आम्ही सरकार'च्या माध्यमातून गावकऱ्यांनी सात लाखांच्या गुंतवणुकीतून 15 लाखांची कमाई केली. सिमेंट, मातीच्या विटा आणि रोपविक्रीतून हा आदर्श घडविला आहे.

जलस्वराज्य प्रकल्पाच्या वतीने "आमच्या गावात आम्ही सरकार' या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 14 गावांची निवड करण्यात आली होती. यापैकी आनंदवन ग्रामपंचायतीने ही योजना यशस्वीरीत्या राबविली. एप्रिल 2004 पासून या योजनेच्या कामांना सुरवात झाल्यानंतर सहा वर्षांमध्ये विविध उद्योगांतून यश मिळविले आहे. ग्रामपंचायतीला प्रोत्साहन क्षमता निधी 50 हजार रुपये वितरित करण्यात आल्यानंतर ग्रामसभा घेण्यात आली. गावनिहाय विकास समिती, सामाजिक लेखा परीक्षण समिती गठित करण्यात आली. या समितीने यवतमाळ जिल्ह्यातील जामगाव, सेंद्रिय (डोलारी) या हागणदारीमुक्त गावांना भेटी दिल्या. बुलडाणा जिल्ह्यातील दत्तापूर येथील दूधसंकलन केंद्राची पाहणी करण्यात आली. या अभ्यासदौऱ्यातून गावकऱ्यांना उद्योगविषयक माहिती मिळाली. अभ्यासगटाची चमू गावात परतल्यानंतर गावविकास आराखडा आणि पंचायत विकास आराखडा तयार करण्यात आला. यात गाव विकासासाठी सात लाख रुपये आणि पंचायत विकासासाठी एक लाख 74 हजार 200 रुपये मिळाले. लोकवाट्यातून दीड लाख रुपये जमा झाल्यानंतर एकूण 10 लाख रुपयांच्या निधीतून विकासकामांना सुरवात झाली. गावविकास आराखड्यात सिमेंट वीटभट्टी आणि सिमेंट खांब निर्मितीचा उद्योग सुरू झाला. यात दोन लाख 48 हजार 400 रुपयांची गुंतवणूक करून उद्योगाची पायाभरणी करण्यात आली. 100 विटांना दोन हजार रुपये असा खर्च यायचा. तयार झालेला माल आनंदवन संस्थांसाठी दोन हजार 200 रुपयांना, तर अन्य लोकांसाठी दोन हजार 200 रुपयांना 100 विटांप्रमाणे विक्री करण्यात आली. आठ मजुरांच्या भरवशावर एक दिवसात आठ हजार विटांची निर्मिती होते. आतापर्यंत पाच लाख 12 हजार 432 रुपयांचे उत्पन्न झाले आहे. सिमेंटशिवाय मातीच्या लाल विटाही तयार करण्यात आल्या. यासाठी तीन लाख 50 हजार 600 रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. एक हजार विटांसाठी एक हजार 200 रुपये खर्च यायचा. त्याची विक्री एक हजार 600 ते दोन हजार रुपयांपर्यंत करण्यात आली. उद्योगात 25 मजूर कामाला आहेत. डिसेंबर ते मे अखेरपर्यंत सहा लाख 13 हजार 603 रुपयांचे उत्पन्न मिळाले. चार मजुरांच्या भरवशावर रोपविक्री केंद्र सुरू झाले. यात एक लाखांची गुंतवणूक होती. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या काळात तीन लाख 94 हजार 840 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रोपविक्री केंद्रातून सायपाम, एरिकापॉम, विद्यालहान, टेबलपॉम, आवळा, जाम, डाळिंब, फणस, अशोका मोठा, चाफा, सुपारीपॉम, ड्रेसिनया, सदाफुली, गुलाब आदी फुलाफळांच्या जाती घेण्यात आल्या.

पंचायत विकास आराखड्यात एक लाख चार हजारांच्या गुंतवणुकीतून झेरॉक्‍स मशिन सुरू करण्यात आली. अवघ्या चार महिन्यांत 29 हजार रुपयांचे उत्पन्न झाले. या कामाशिवाय गावाच्या विकासासाठी सांडपाणी नालीद्वारा तलावात सोडून मत्स्यपालन, चारा उत्पादन, भाजीपाला घेण्यात आला. मासेमारीतून तीन लाख, तर भाजीपाल्यातून दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळाले आहे. मिळालेल्या एकूण नफ्यातील 80 हजार रुपये खर्चून आनंदवन येथे पथदिवे लावण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला आहे

प्रतिक्रिया
On 5/14/2010 5:57 PM sarang said:
या बातमी मुले लोकांमुळे समूह भावना निर्माण होऊन गाव विकासाची वाट शोधण्यास मदत झाली आहे. अशाच प्रकारे शाशकीय योजनामध्ये यशस्वी झालेल्या कामांना प्रशिद्धी दिल्यास लोकांमध्ये विकासाची भावना जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. कृष्णकांत खानझोडे -९८५०६१२९१३ सारंग काकडे जलस्वराज्य प्रकल्प जिल्हा परिषद -चंद्रपूर
सावली तहसील

सावली तहसील

चंद्रपुर जिले में सावली तहसील है. मूल गढ़चिरोली रोड पर स्थित है, के बारे में 11.26 किलोमीटर है.1961 में जनसंख्या 4,871 थी. सावली में सबसे जादा धान की खेती के तहत किया जा रहा है. सरासरी चौथाई गांवों में चावल के उत्पादन का है. इसके ठीक दो भूमि टैंक, आसोला मेंढा तलाव  और कई सिंचाई कुओं से सिंचित कर रहे हैं. कुछ परिवारों तसर  रेशम की बुनाई में लगे हुए हैं और एक बार उद्योग एक बहुत ही समृद्ध हालत में था. यह कमी आई है. और अब विलुप्त हो सकता है. अगर कोई प्रोत्साहन दिया जाता है. अन्य स्थानीय उल्लेख के लायक उद्योग चप्पल के विनिर्माण के लिए जो जगह इतनी अच्छी तरह से जाना जाता है. 1894 में गांव को गंभीरता से एक आग है कि निराश और 800 से अधिक घरों की राख करने के लिए कम से प्रभावित किया गया था. हालांकि, गांव झटका है कि पहले से बरामद किया है लंबी और अब अच्छी तरह से अपनी समृद्धि के लिए रास्ता है. Saoli एक स्कूल, एक औषधालय और एक पोस्ट कार्यालय है. एक साप्ताहिक बाजार में गुरुवार को आयोजित है. उद्योग न होने से तहसील के युव शहर में रोजगार के लिए आते है.
चंद्रपुरात सरासरी 116.5 मि.मी. पाऊस!

चंद्रपुरात सरासरी 116.5 मि.मी. पाऊस!

Sunday, August 08, 2010 AT 12:00 AM (IST)
चंद्रपूर - गेल्या 24 तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, वर्धा आणि इरई नदी दुथडी भरून वाहत आहे. शुक्रवारी (ता. 6) ब्रह्मपुरी तालुक्‍यातील नांदगाव (जानी) येथे भिंत कोसळून मुकरू बांगरे हा तरुण ठार झाला. या पावसात चंद्रपूर, कुनाडा, राजुरा, ब्रह्मपुरी, कोठारी येथील घरांची पडझड झाली.
जिल्ह्यात मागील 48 तासांत सरासरी 116.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. यात सावली, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, जिवती, सिंदेवाही, कोरपना, मूल आणि ब्रह्मपुरी तालुक्‍यांत मुसळधार पाऊस झाला. इरई धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने संभाव्य धोका लक्षात घेता सहा दरवाजे उघडण्यात आले. 207 दश. घ.मी. क्षमता असलेल्या इरई धरणात 206.4 दश. घ.मी. जलसाठा भरला आहे. एकूण सात दरवाजे असलेल्या धरणातील साठा वाढल्याने सुरवातीला दोन दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन आणि सायंकाळी सहा दरवाजे उघडण्यात आले. सर्व दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले असून, इरई नदी दुथडी भरून वाहत आहे. चंद्रपूर ते दाताळा जाणारा मार्ग इरई नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला होता. या पावसामुळे शुक्रवारी सायंकाळपर्यंत लाठी-कोठारी, वणी-माजरी आणि घुग्घुस-वणी या प्रमुख मार्गांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे परिवहन महामंडळाने अनेक बसफेऱ्याही रद्द केल्या होत्या. जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्ना जोशी आणि दिवाणी न्यायाधीश खांडडहाले यांच्या शासकीय निवासस्थानावरही झाड कोसळल्याने बरीच हानी झाली. याशिवाय पोलिस मुख्यालय चौकातील मोठे झाड उन्मळून पडल्याने नागपूर-मूल मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली.
चंद्रपूर जिल्हा :
सावली : 161, गोंडपिंपरी : 154.2, पोंभुर्णा : 153, चंद्रपूर : 140, राजुरा : 136.2, बल्लारपूर : 128.4, जिवती : 127, सिंदेवाही : 123, कोरपना : 113, मूल : 106.2, ब्रह्मपुरी : 103.2, नागभीड : 97.6, भद्रावती : 93,90 मि.मी.पेक्षा कमी पावसाचे तालुके ः वरोरा- 62.4, चिमूर- 49.5


^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
तुमची प्रतिक्रिया लिहा

* नाव:
* ई-मेल:
* प्रतिक्रिया:

Saturday, August 07, 2010

आठवडाभरातच सीडी रस्त्यावर

आठवडाभरातच सीडी रस्त्यावर

पायरसी रोखणारा अधिकारी बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, August 05, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: pirated CD, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - "सकाळ'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आठ दिवस गायब राहिलेल्या बनावट सीडी पुन्हा रस्त्यावर आल्यात. जटपुरा गेट ते प्रियदर्शिनी चौकापर्यंत हातगाड्यांवर सीडी विकताना दिसून आले. शहरात अश्‍लील सीडीचे प्रकरण गाजत असतानाच हा प्रकार खुलेआम सुरू असल्याने प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. यात कारवाई करण्यासाठी पोलिसांचे हात कमी पडत असून, पायरसी रोखणारा अधिकारीच मुळात बेपत्ता झाला आहे.
चित्रफितींच्या बनावट सीडी बाजारात येऊ नयेत, याची जबाबदारी पायरसी रोखणाऱ्या कंपन्यांना दिली जात; मात्र आता उलट झाले आहे. शहरातील प्रमुख वितरक पायरसी रोखणाऱ्या अधिकाऱ्याला हाताशी धरून बनावट सीडीचा गोरखधंदा सुरू झाला आहे. हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. "अग्रवाल आणि शाहा' नामक व्यक्ती सीडीकिंग असल्याचे प्रकरण पुढे आले होते. त्यावेळी तब्बल अडीच लाखांच्या सीडी जप्त करण्यात आल्या होत्या. यातील अनेक सीडी अश्‍लील आणि बनावट असल्याचे पोलिसांना मिळालेल्या अहवालातून स्पष्ट झाले. याउपरही कारवाई करण्यात आलेली नाही.
हातगाडीवर विकल्या जाणाऱ्या सीडी चित्रपट गाण्यांच्या असतात, असे प्रथमदर्शनी भासविले जात होते; मात्र एखाद्या ग्राहकाने हळू आवाजात अश्‍लील चित्रफितीची मागणी केल्यास तीसुद्धा त्याला पुरविण्यात येते.
बोगस बिलांतून 25 लाखांचा गैरव्यवहार

बोगस बिलांतून 25 लाखांचा गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा

Friday, August 06, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: crime, bribe, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - कंत्राटी कर्मचाऱ्यांना अग्रीम रक्कम देता येत नसतानादेखील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी बोगस बिले जोडून सर्वशिक्षा अभियानातील 25 लाखांचा गैरव्यवहार केल्याची माहिती आहे. वर्षभर प्रभार सांभाळणाऱ्या या शिक्षणाधिकाऱ्यांची नुकतीच बदली झाल्यानंतर हा घोळ लक्षात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मागील दीड वर्ष कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी नव्हते. त्यामुळे उपशिक्षणाधिकारी पदावरील अधिकारीच ही खुर्ची सांभाळत होते. जिल्हा परिषदेच्या सभा किंवा मोठ्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान हे प्रभारी अधिकारी नेहमीच गायब राहायचे. त्यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात हजेरीपटावर आजारी रजा, दौरा, तातडीच्या कामाची नोंद आहे. सभांमध्ये उत्तर देणे जमत नसल्याने आणि आपला भोंगळ कारभार उघड होऊ नये म्हणून कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविणे, हा प्रकार त्यांच्या कार्यकाळात चालला. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची बदली नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या नव्या अधिकाऱ्याला मागील कार्यकाळात झालेला गैरव्यवहार लक्षात आला. मात्र, त्यांनी याची कुठे वाच्यता केलेली नाही. विश्‍वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटी कर्मचाऱ्यांना अग्रीम रक्कम देता येत नाही. याउपरही प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांनी एक ते दीड लाखांचे अग्रीम राशी वितरित केली. त्याची कुठेही नोंद नसून, बोगस बिले जोडण्यात आली आहेत. सर्वशिक्षा अभियानांतर्गत येणाऱ्या अपंग एकात्म शिक्षण, पर्यायी शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम आदींची बिलेही बोगस असल्याची माहिती आहे. सात ते 10 जूनपर्यंत पंचायतराज कमिटीकरिता शिक्षण विभागाची एक चमू पाठविण्यात आली. त्यासाठी त्यांनी खासगी बस भाड्याने केल्याचे दाखविले. यात 20 ते 25 हजारांचे बिले जोडण्यात आली आहेत. वस्तुत: बस भाड्याने करण्यात आलेली नव्हती. जर केली असेल तर डिझेल किंवा टोलटॅक्‍सच्या पावत्या जोडलेल्या नाहीत. शिवाय कंत्राटी साधनव्यक्तीच्या नियुक्ती आणि बदलीतही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती आहे.

Thursday, July 29, 2010

भोंदू साधूनेही केले लैंगिक शोषण?

भोंदू साधूनेही केले लैंगिक शोषण?

Friday, August 06, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: crime, sexual harassment, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - राज शहा याच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण गाजत असतानाच आज (ता. पाच) शहरातील एका पीडित तरुणीने वृत्तपत्रांच्या कार्यालयात निनावी पत्र पाठवून खळबळ उडवून दिली आहे. शहरातीलच एक महाराज (भोंदू साधू) याने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने या पत्रातून केला आहे.
गेल्या 15 दिवसांपासून लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण आणि अश्‍लील चित्रीकरण केल्याचे प्रकरण शहरात गाजत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी राज शहा, त्याचा मित्र पिंटू रॉय आणि एक मैत्रीण अशा तिघांच्या सेक्‍स स्कॅंडल नेटवर्कचा पर्दाफाश झाला. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असतानाच आज वृत्तपत्रांच्या कार्यालयात टपाल कार्यालयातून एक निनावी पत्र आले. त्यात पीडित तरुणीने राज शहाप्रमाणेच ढोंगीबाबाच्या कृत्याचा पर्दाफाश करण्याची विनंती पोलिस आणि प्रसारमाध्यमांना केली आहे. हिंदी भाषेत लिहिलेल्या या पत्रातून तिने राज शहाचे प्रकरण उघडणाऱ्या तरुणींच्या धाडसाचे अभिनंदन केले आहे. मात्र, पत्रामध्ये ती ढोंगीबाबाच्या वासनेला कशी बळी पडली, याचा पाढाही वाचला आहे. तिने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हा ढोंगीबाबा शहरातील एका प्रतिष्ठित मंदिरात राहतो. धर्म, पूजा आणि मानवसेवेच्या नावाखाली गेल्या अनेक वर्षांपासून त्याने तरुणींची शिकार केली आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक शोषण केल्याचा आरोपही तिने केला आहे. केलेल्या कृत्यांचे संपूर्ण पुरावे असल्याचा दावाही तिने केला आहे

** ** ** * *** * * ** * ** *** * ** * * ** * * *  ****  ** **************
अखेर "नीतू' कोठडीत


Thursday, August 05, 2010 AT 12:00 AM (IST)

Tags: crime, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - लैंगिक शोषणाच्या प्रकरणात मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी प्रमुख भूमिका निभावणाऱ्या "नीतू'ला अखेर पोलिसांनी आज (ता. चार) दुपारी दीडच्या सुमारास अटक केली. लगेच तिला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 15 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत तिची रवानगी केली. दरम्यान, तिच्या अटकेसाठी महिला संघटनांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते.
बंगाली कॅम्प येथील एक पोल्ट्री व्यावसायिक शहा यांचा मुलगा राज याने तब्बल सहा तरुणींना लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केल्याचा प्रकार एका पीडित तरुणीच्या माध्यमातून उघडकीस आला. या पीडित तरुणीने लग्नास नकार मिळाल्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. गेल्या आठवडाभरात या प्रकरणातील अनेक बाबी उघड झाल्याने राज शहा याच्यासह पिंटू रॉय यास अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात मुलींना जाळ्यात ओढण्याची प्रमुख भूमिका नीतू नामक 22 वर्षीय तरुणीने निभावल्याचे पीडितांनी दिलेल्या तक्रारीतून स्पष्ट झाले. मात्र, आठवडा लोटूनही तिला ताब्यात घेण्यात आले नव्हते. मध्यंतरी एक-दोनदा पोलिस ठाण्यात बोलावून तिची विचारपूस करण्यात आली. मात्र, तिने राज शहा हा मानसभाऊ असल्याचे सांगून पोलिसांच्या खाकीतून अलगद बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकरणात नीतूची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे लैंगिक शोषणाच्या प्रकरणात नेमके काय घडले, याची चौकशी करण्यासाठी नीतूच्या अटकेचीही मागणी भाजप आणि मर्दानी महिला आस्था मंचाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून केली. चार-पाच दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी आज दुपारी दीडच्या सुमारास तिला अटक केली. लागलीच तिला न्यायालयात हजर करण्यात आले.

'राज'ने दाखविले सहा मुलींना लग्नाचे आमिष!
Sunday, July 25, 2010 AT 12:00 AM (IST)
चंद्रपूर - बंगाली कॅम्प येथील एका पोल्ट्री व्यावसायिकाच्या मुलाने तब्बल सहा तरुणींना लग्नाचे आमिष देऊन फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातीलच एका पीडित 18 वर्षीय मुलीने प्रेमविरहातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या संदर्भात तक्रार दाखल होऊनही रामनगर पोलिसांनी आरोपी "राज' यास अटक केलेली नाही.
बंगाली कॅम्प येथील रहिवासी असलेल्या एका सुशिक्षित कुटुंबातील 18 वर्षीय युवती नागपूर मार्गावरील कॉन्व्हेंटमध्ये बारावीचे शिक्षण घेत आहे. तीन महिन्यांपूर्वी एका मैत्रिणीच्या माध्यमातून राज या 24 वर्षीय तरुणासोबत ओळख झाली. या तीन महिन्यांत या दोघांमध्ये प्रेमसंबंधही जुळले. यादरम्यान राजने तिला लग्न करणार असल्याचे भासवून संबंध ठेवले. एकाच समाजातील असल्याने लग्नाला कुटुंबीयांकडून विरोध होणार नाही, असेही तरुणाने तिला सांगितले. मात्र, काही दिवसांनंतर लग्नाचे आमिष देणारा राज या युवतीशी मोबाईलवर बोलण्यास आणि भेटण्यास टाळाटाळ करू लागला. आजपर्यंत त्याने तब्बल सहा तरुणींना लग्नाचे आमिष दिल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पीडित युवतीच्या कुटुंबीयांनी एका मध्यस्थीमार्फत राजचे वडील असलेल्या पोल्ट्रीफार्मच्या मालकाकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा त्यांनीही उडवाउडवी करून प्रकरण दाबण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित युवतीने फिनॉईल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला डॉ. अमल पोद्दार यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारानंतर ती बरी झाली असून, आज (ता. 24) ती प्रथमच प्रसिद्धिमाध्यमांपुढे आली. घटनेची सर्व हकिगत तिने सांगितली.

 -----------------------------------------------
सकाळ वृत्तसेवा

Thursday, July 29, 2010 AT 12:22 AM (IST)
चंद्रपूर - पोल्ट्री फार्म व्यावसायिक शहा यांचा मुलगा राज याने लग्नाचे आमिष देऊन शारीरिक शोषण केल्याच्या प्रकरणात आज (ता. 28) आणखी एक पीडित तरुणी प्रसारमाध्यमांसमोर आली. तिनेही राजच्या कृत्यांचा पर्दाफाश केल्याने प्रकरणातील गुंतागुंत आणखीच वाढली आहे.
बंगाली कॅम्प येथील एका 18 वर्षीय तरुणीने प्रेमविरहातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर राज शहा याचे वासनाकांड उघड झाले. तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, अश्‍लील चित्र बाळगणे या आरोपाखाली राज यास पोलिसांनी नुकतीच अटक केली. राजच्या कृत्याची माहिती देताना आज एका युवतीने सांगितले की, सरदार पटेल महाविद्यालयातील "नीतू' नामक मुलीने राज याच्याशी ओळखी करून दिली. पहिल्याच भेटीत त्याने लग्न करू असे आश्‍वासन दिले होते. आकाशवाणीजवळील "राजनूर' या निवासीसंकुलातही त्याने तीनदा बोलाविले. अनेकदा दारू पिऊन असायचा. त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे तीन महागडे मोबाईल होते. काही दिवसानंतर लग्नाचे आमिष देणारा राज मोबाईलवर बोलण्यास टाळाटाळ करू लागला. मोबाईलही नवीन आलेल्या तरुणीला दिला. 17 एप्रिलनंतर त्याची कधीही भेट झाली नाही. दरम्यान, सुरवातीला तक्रार करणारी तरुणी 28 एप्रिलपासून राजच्या संपर्कात आली. तेव्हापासूनच आपण त्याच्यापासून दूर गेल्याचेही तिने सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत चार तरुणींनी आपले म्हणणे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांकडून ठोस कारवाई केलेली नाही. ज्या दिवशी बंगाली कॅम्प येथील तरुणीने विष प्राशन केले. त्यावेळी ती रुग्णालयात भरती असताना अन्य मुलीही भेटायला आल्या होत्या. त्या राजच्या सांगण्यावरूनच आल्याचेही उघड झाले आहे. मुलींना राजशी ओळख करून देणारी "नीतू' ही राजकडून पैसे घेऊन काम करीत होती, असे तक्रारकर्त्या दोन्ही तरुणींनी सांगितले. या दोघींनीही पोलिस अधीक्षक डॉ. मनोज शर्मा यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली.

मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक

Monday, July 26, 2010 AT 02:42 PM (IST)
चंद्रपूर - लग्नाचे आमीष दाखवून मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमास पोलिसांनी सोमवारी अटक केली. राज शहा (वय २२, रा. चंद्रपूर) असे त्याचे नाव आहे.

चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या एका मुलीबरोबर शहा याने गेले काही महिने शारीरिक संबंध ठेवले होते. तिच्याबरोबर लग्न करण्याचे आमीष त्याने दाखविले. अखेर गेल्या आठवड्यात त्याने लग्नास नकार दिल्यानंतर संबंधित मुलीने पोलिस ठाण्यात शहाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्या दिवसापासून शहा फरार होता. पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी धाड टाकली. त्यामध्ये अनेक अश्‍लिल मासिके आणि अन्य आक्षेपार्ह साहित्य आढळून आले.
शारीरिक संबंधांच्या चित्रीकरणाचा संशय

Monday, July 26, 2010 AT 12:31 AM (IST)
चंद्रपूर - लग्नाचे आमिष देऊन तरुणीशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या राजच्या निवासी संकुलात पोलिसांनी छापा घातल्यानंतर प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. त्याच्या बेडरूममधील काही साहित्यांवरून शारीरिक संबंधांचे चित्रीकरण झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. यातील पीडित 18 वर्षीय मुलीने या सर्व प्रकाराचा भांडाफोड केला आहे.
बंगाली कॅम्प येथील रहिवासी असलेले पोल्ट्री फार्म व्यावसायिक प्रकाश शहा यांचा मुलगा राज याने 18 वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. मात्र, काही दिवसांनंतर लग्नाचे आमिष देणारा राज या युवतीशी मोबाईलवर बोलण्यास आणि भेटण्यास टाळाटाळ करू लागला. या प्रेमविरहात 18 वर्षीय युवतीने फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नही केला. त्यानंतर तिने पोलिसांना तक्रार देऊन राजने केलेल्या कृत्याची माहिती दिली. तिने दिलेल्या माहितीत आजपर्यंत त्याने तब्बल सहा तरुणींना लग्नाचे आमिष दिले असून, शारीरिक संबंध ठेवले होते. एका मैत्रिणीच्या माध्यमातून अन्य तरुणीशी ओळखी करून शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. अशा नवनव्या तरुणींना गाठून फसविल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणाचा भांडाफोड करण्यासाठी पीडित तरुणी आज (ता. 25) स्वतः पोलिस अधीक्षक डॉ. मनोज शर्मा आणि अधिकाऱ्यांना घेऊन गेली. या पोलिस चौकशीत अनेक नवीन बाबी उघड झाल्या. इरई नदीच्या काठावर त्याच्या मालकीचे "राजनूर' नावाचे निवासी संकुल आहे. पहिल्याच माळ्यावर त्याची आलिशान खोली असून, तिथे सर्व व्यवस्था आहे. पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्या फ्रिजमध्ये 10 बिअर बॉटल्स, आक्षेपार्ह साहित्य, चित्रीकरण करण्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रणा आढळून आली. पोलिस अधीक्षक डॉ. मनोज शर्मा यांनी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची तपासणी केली. आरोपी राजचे वडील प्रकाश शहा यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. या प्रकरणात राजला सहकार्य करणाऱ्या पिंटू आणि कपिल नामक दोन तरुणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Tuesday, July 27, 2010

ताडोबामध्ये नव्या कोळसा खाणी?

ताडोबामध्ये नव्या कोळसा खाणी?

ताडोबा Tiger project
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र अभयारण्यातील वाघांच्या भ्रमंती परिसरातील आगरझरी आणि लोहारा येथील कोळसा खाणी रद्द करण्याचा निर्णय होऊन अवघे काही दिवस झालेत. या पार्श्वभूमीवर, याच अभयारण्याला लागून असलेल्या प्रदेशात नव्याने काही कोळसा खाणींना मंजुरी मिळावी म्हणून केंद्र सरकार दरबारी धाडण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळू लागली आहे. त्यापैकी अभिजीत ग्रुपच्या बन्दर कोल कंपनीला २९ मे २००९ रोजी मंजुरी देण्यात आल्याचे उघडकीस आले.
चिमूर तालुक्याच्या बाजूने मेळघाट अभयाण्याशी जोडणारा हा भाग असून ताडोबा अभयारण्याच्या बाजूस कोळसा पट्टा दिल्याने व्याघ्र अभयारण्याला धोका निर्माण झाल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

New mining threat near Tadoba
CHANDRAPUR: Even as the ministry of environment and forests (MoEF) has de-allocated the Lohara and Agarzari coal blocks which pose threat to the tiger corridors of Tadoba Andhari Tiger Reserve (TATR), the abode of around 45 tigers now faces a fresh threat from a couple of other mines proposed very close to the buffer zone boundary. The coal block allocated to Bander Coal Company Private Limited (BCCPL) in Chimur tehsil to the north of the tiger reserve threatens to cut off the only corridor connecting TATR to Melghat tiger landscape.
यासंबंधातील ताज्या उपलब्ध माहितीनुसार , ब्रह्मपुरी वन विभागाकडे बांदेर कंपनीने प्रस्ताव दिला असून तेथील वन संरक्षक संजय ठाकरे यांनी तो राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांकडे धाडला आहे. बांदेर कोळसा कंपनीने खाणकाम करण्यास परवानगी मागितली होती. त्यातील एक ओपन कास्ट आहे. कंपनीला खोदकाम करण्यासाठी या क्षेत्रात १,६०४.६७ हेक्टरची जमीन हवी आहे. या जमिनीत खाजगी मालकांची ३९५.६७ हेक्टर , महसूल खात्याची ३८.८४ हेक्टर तर वन खात्याची १,१७०.६० हेक्टर जमीन आहे.
चंद्रपूरचे लढाऊ कार्यकर्ते बंडू धोत्रे म्हणाले की , या कोळसा पट्टयात नागपूर , वर्धा आणि बोर अभयारण्य येते. शिवाय , हे सर्व भाग मानवी वस्तीचे आहेत. तेथे शेतीही केली जाते. रस्त्यांनी ते परस्परांशी जोडलेले आहेत म्हणूनही ते पर्यावरणीयदृष्टया संवेदनशील आहेत.
                            Bandu Dhotre
धोत्रे म्हणाले की , बांदेर कंपनीला देऊ केलेला कोळसा पट्टा ताडोबा अभयारण्याच्या १० कि. मी. च्या हद्दीत येतो. या अभयारण्याच्या मुख्य भागापासून पुढे केवळ ७.५ कि. मी. चा भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हा कोळसा पट्टा बफर झोनच्या बाहेर येत असला तरी कोळसा खाणीची सीमा बफर झोनला लागून आहे. ओपन कास्ट खाणकाम तेथून नऊ कि. मी. वर होणार आहे. हा पूर्ण भाग १० कि. मी. च्या आत येतो. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अभयारण्याचा संपूर्ण संवेदनशील भाग म्हणजे १० कि. मी. ची सीमा असली पाहिजे.
सरकारने अजून संवेदनशील भाग किती आहे , हेच जाहीर केलेले नाही , असे सांगून ते म्हणाले की , याउपरही अशा संवेदनशील भागात खाणकामांना परवानगी देता कामा नये. ताडोबातील वन्यजीवांवर विपरित परिणाम होतील म्हणून वने आणि पर्यावरण मंत्रालयाने याआधी १९९९ मध्ये याच कोळसा खाणीचा प्रस्ताव फेटाळला होता. आता १० वर्षांनंतर व्याघ्र भ्रमंतीचा मार्गच संकुचित झाला आहे. अशा स्थितीत प्रस्ताव फेटाळण्यात आलेल्या कोळसा खाणीला परवानगी देणे अयोग्य आहे.
कोळसा खाणीचा हा पट्टा मुळात ब्रह्मपुरी वन विभागात येतो. हा भाग प्राणी आणि मनुष्य यांच्यातील संघर्षासाठी ओळखला जातो. खाणींमुळे प्राण्यांवर संकट येऊ शकते. ताडोबा अभयारण्य व्यवस्थापनाने हा भाग धोकादायक बनल्याचे म्हटलेले आहे. एका आराखडयाअंतर्गत त्याचे नव्याने संवर्धनही व्यवस्थापनाने सुरू केले आहे. वनेमंत्री जयराम रमेश यांच्या ध्यानात ही बाब अलीकडच्या दिल्ली भेटीत आपण आणून दिल्याचेही धोत्रे यांनी सांगितले. आपणास अद्यापपर्यंत कंपनीकडून पर्यावरणविषयक मंजुरीसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही , असे त्यांनी म्हटले आणि पर्यावरणाला मारक कोणत्याही प्रकल्पाला मंत्रालयाकडून परवानगी दिली जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले , असेही धोत्रे म्हणाले.

Wednesday, July 21, 2010

"श्रुजला श्रवंती' धरणाचा मुद्दा ऐरणीवर

"श्रुजला श्रवंती' धरणाचा मुद्दा ऐरणीवर

Tuesday, July 20, 2010 AT 09:15 AM (IST)

Tags: chandrababu naidu, chandrapur, vidarbha, dam, babhali dam

चंद्रपूर - आंधप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या "बाभळी' प्रकरणानंतर गोंडपिंपरी तालुक्‍यातील प्राणहिता नदीवरील "डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राणहिता श्रुजला श्रवंती' या धरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या धरणामुळे आंधप्रदेश सीमेला लागून असलेली या तालुक्‍यातील हजारो हेक्‍टर शेतजमीन व शेकडो गावे पाण्याखाली येणार आहेत. त्यामुळे आधीच या धरणाविषयी शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या पार्श्‍वभूमीवर नायडू यांच्या घुसखोरीनंतर सीमावर्ती भागात या धरणाचा वाद उफाळून येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
गोंडपिंपरी तालुका हा महाराष्ट्र आंध्र सीमेवर आहे. या तालुक्‍यातील शिवणी या गावाजवळ वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम आहे. या संगमातून पुढे वाहणाऱ्या नदीला प्राणहिता म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र व आंधप्रदेशाला जोडणारी ही नदी आहे. याच नदीवर शिवणी गावाजवळ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राणहिता श्रुजला श्रवंती' हे महाकाय धरण होत आहे. याचे अंदाजपत्रक 38 हजार कोटी रुपयांचे आहे. आंधप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी याची महत्त्वाकांक्षी योजना होती. तेलंगणामधील आदिलाबाद, करीमनगर, निजामाबाद, मैदक या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी हे धरण वरदान ठरणार आहे. सोबतच रंगोरेड्डी व हैद्रराबाद या आंध्रातील प्रमुख शहरांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा याच धरणातून होणार आहे. साधारणत: वर्षभरापूर्वी प्राणहिता नदीवर आंधप्रदशेचे तत्कालीन मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या हस्ते या धरणाचे भूमिपूजन झाले. उत्सुकतेपोटी महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील नागरिकही गेले होते. ते परत आल्यानंतर या धरणाविषयी चर्चा सुरू झाली.
दरम्यान, हे धरण झाल्यास महाराष्ट्रातील नदीकाठावरील शेकडो गावे व हजारो हेक्‍टर शेतजमीन बुडेल, अशी भीती व्यक्त होऊ लागली. यानंतर जिल्ह्यातील नेत्यांनी विविध पातळ्यांवर याचा विरोध सुरू केला. भूमिपूजनस्थळी जाऊन आंदोलने केलीत. जलसंपदा व ऊर्जामंत्री अजित पवार यांनीही हा मुद्दा नागपूर येथील अधिवेशनात उपस्थित केला होता. तेव्हा धरण बांधण्यासाठी आंधप्रदेश सरकारने महाराष्ट्र शासनाची परवानगीच घेतली नसल्याची बाब समोर आली होती. गाव आणि शेतजमीन बुडेल हीच भीती घेऊन या परिसरातील नागरिक धरणाचे काम बघत आहे.


जमीन अधिग्रहणाचे काम जोरात
राजशेखर रेड्डीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने कामाला गती आली होती. मात्र, रेड्डी यांचे अपघाती निधन झाले आणि कामाची गती मंदावली. या धरणासाठी आवश्‍यक जमिनी अधिग्रहणाचे काम आंध्रात जोरात सुरू आहे. जमिनीला योग्य भाव द्यावा, या मागणीसाठी तेथील शेतकरी आंदोलन करीत आहेत.


धरणाचा निवडणुकीत फटका

या धरणाचा फटका आंध्रातील सिरपूर टाऊनचे माजी आमदार कोनेरू कोनप्पा यांनाही बसला. ते याच मुद्द्यावरून मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. आंध्राच्या सीमावर्ती भागात महाराष्ट्रातील प्राणहिता नदीवर असलेल्या कार्तिक स्वामींचे भक्त मोठ्या संख्येत राहतात. मागील विधानसभा निवडणुकीत कोनेरू कोनप्पा यांच्या विरोधकांनी धरण बांधल्यानंतर महाराजांचे वास्तव्य असलेले मंदिर बुडेल, असा प्रचार केला. या धार्मिक मुद्द्याचा फटका कोनेरू कोनप्पा यांना बसला. ते पराभूत झाले. दरम्यान, या पार्श्‍वभूमीनंतर येणाऱ्या पोटनिवडणुकीच्या हेतूने माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बाभळी धरणाला भेट देऊन वाद उपस्थित केल्यानंतर पुन्हा आता प्राणहिता धरणाचा मुद्दा समोर आला आहे.



दरम्यान, याबाबत राजशेखर रेड्डी याचे निकटवर्तीय व या धरणाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे सिरपूर टाऊनचे माजी आमदार कोनेरू कोनप्पा यांच्याशी संपर्क साधला असता धरणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान होणार नसल्याचे सांगितले. मात्र, तेलंगणात हरितक्रांती होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. धरणाच्या कामाला सुरवात झाली आहे. जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे. संबंधित कंपन्यांशी धरण बांधकामासंदर्भात करार झाला आहे. यासाठी पाचशे कोटी रुपये या कंपन्यांना देण्यात आले आहे. या धरणासंदर्भात केंद्र शासनाची जलव्यवस्थापन समिती व आंध्र सरकारचा करार आहे. प्राणहिता नदीवरील 360 टीएमसी एवढ्या पाण्याचा आंध्र वापर करू शकतो, असे कोनेप्पा म्हणाले. सध्या 165 टीएमसी पाणी वापरण्याची योजना आहे.