चंदपूर नगरीत तब्बल ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. ४ मे १९७९ मध्ये चंदपूरातील ज्युबिली शाळेच्या प्रांगणात ५३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. माजी केंदीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे स्वागताध्यक्ष्य होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक वामन चोरघडे होते. तीन दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनाला दिग्गज साहित्यिकांनी हजेरी लावली होती. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विं.दा.करंदीकर, नारायण सुवेर्, या साहित्य संमेलनाला उपस्थित होते. तेव्हा शहरात हॉटेल ची सोय नव्हती. त्यामुळे पाहुणे जुबली शाळेतच थांबले. काही जन कुणाच्या घरी थांबून होते. ५३ व्या साहित्य संमेलनात नामांतरवाद्यांचा मुद्दा गाजला होता. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी नामांतर समर्थकांनी गोंधळ घालत संमेलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठांनी मध्यस्ती करून आंदोलकांना आवरले आणि आग तात्पुरती शांत झाली. संमेलनकाळात नारायण सुवेर्, डॉ. श्रीपाद भालंचंद जोशी यांच्यासारखे अनेक कवी चंदपूरच्या रस्त्यावरून स्थानिक गांधी चौकापर्यंत कविता वाचत गेले होते तर विठ्ठल वाघ मोठ्याने कविता गाऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. या अभिनव प्रकारामुळे लाकोंनी संमेलनाचा मुख्य मंडप सोडून या अनोख्या कार्यक्रमाकडे धाव घेतली होती.
३२ वर्षांपूवीर्च्या या आठवणी रसिकांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. त्या संमेलनात सहभागी झालेल्या जुन्या पिढीच्या जोडीने आता इथली नवी पिढी ८५ व्या साहित्य संमेलनासाठी सज्ज झाली आहे.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
ब्रम्ह्पुरी प्रतिनिधी :- गेली आठ वर्षे राजकीय आखाड्यात अडकून पडलेल्या वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया हा जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रबोधनाची गरज आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले. ब्रम्हपुरी येथील पंचशील वसतिगृह मैदान येथे संत गाडगेबाबा राज्य स्तरीय प्रबोधन अभियान अंतर्गत चमत्कार प्रात्यक्षिकांसह शुक्रवारी "वृक्ष तेथे बाया बुवा तेथे बाया" या विषयावर प्राचार्य श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यक्रमात प्रा. शाम मानव यांनी सर्व जनतेला पटवून दिले की देव धर्माला माझा विरोध नाही.त्यांच्या नावावर सामान्य माणसाला लुबाडनाऱ्याना विरोध असून समाजात होणाऱ्या अनिष्ट चालीरीती स्त्रियांच लैगिक शोषण याना बळी पडू नये ,,खरे संत कसे ओळखायचे प्रात्यक्षिक चमत्कार करून जनजागृती करून समाजातील अंधश्रध्देंच्या अधीन झालेल्या मानवाच्या डोक्यातून कचरा काढून कस्ल्याही प्रकारचे तंत्र मंत्र सिद्धी नाही असेल तर तंत्र...
नागपूर : येथील माजी महापौर आणि माजी आमदार कृष्णराव रामाजी पांडव यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता. 22) निधन झाले. ते 88 वर्षाचे होते. 1970 साली त्यांनी नागपूर महानगरपालिकेत उपमहापौर, 1971 मध्ये स्थायी समिती अध्यक्ष आणि 1973 साली महापौरपद भूषविले. 1981 साली जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, त्यानंतर प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम बघीतले. बारा वर्ष त्यांनी विधानपरिषदेत आमदार म्हणून महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. नगरसेवक ते आमदार या राजकीय प्रवासात त्यांनी प्रदेश कॉग्रेस कार्यकारिणीत विविध पदे भूषविली. सन्मार्ग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. गरीब होतकरु आणि मागासवर्गातील मुलांना शिक्षणाची द्वारे खुली करुन देण्यासाठी या संस्थेमार्फत जवळपास 45 शैक्षणिक महाविद्यालयांची स्थापना करुन भरीव कार्य केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, केंद्रीय मंत्री वंसतराव साठे, निर्मलाबाई देशपांडे यांचेसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या मागे गिरीश आणि किरण अशी दोन मुलगे, चार मुली असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवारी (ता. 23) बारा वाजता धंतोली येथील निवासस्थानातून निघू...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...